• Fri. Mar 6th, 2026
    शेवटच्या टप्प्यात शिंदे गटात गेलेला तो आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, खैरेंचा खळबळजनक दावा

    छत्रपती संभाजीनगर: सर्वात शेवटी शिंदे गटात सामील झालेले आमदार उदय सामंत हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. उदय सामंत हे स्वत: उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. कारण, उदय सामंत हे सर्वात शेवटी शिंदे गटात गेले होते. त्यामुळे १६ अपात्र आमदारांमध्ये उदय सामंत यांचा समावेश नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटातील अनेक आमदार फुटणार आहेत. ते पु्न्हा आमच्याकडे येऊ शकतात. उद्या काय परिस्थिती निर्माण होईल, हे माहिती नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होईल, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

    Maharashtra Politics: शिंदे गटाचे १६ नव्हे तर ३९ आमदार अपात्र ठरणार; ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

    महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल, असे कायदेशीर तज्ज्ञांचे मत आहे. निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असल्याने फडणवीस या गटाने धावपळ सुरू केली होती धावपळीची यामुळे अनेकांनी अंदाज काढला. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची काहीतरी गडबड सुरु असल्याचे दिसत आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये देखील ठाकरेंच्या बाजूने निकाल लागेल, असा अंदाज लावला आहे. याच्या आधारावर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.

    Jayant Patil ED Notice : मोठी बातमी,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

    मी हिंदुत्वादी जरी असलो तरी मी देव भक्त आहे. मी कोर्टाला विनंती करू शकत नाही. मात्र मी देवाला प्रार्थना करू शकतो. राज्याचा सत्ता संघर्षाचा निकाल हा निकाल उद्धवजींच्या बाजूने लागू दे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर जे जाणार आहे त्याच्यावर काय बोलायचं? उर्वरित आमदार जे आहेत ते बाद होतील. मात्र, जे मस्तीत वागत होते, उद्धव साहेब, आदित्य साहेब, संजय राऊत साहेब यांना काहीही बोलत होते. ती मस्ती लोकांना पटली नाही. ती मस्ती आता रिकामी होईल, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed