महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल, असे कायदेशीर तज्ज्ञांचे मत आहे. निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असल्याने फडणवीस या गटाने धावपळ सुरू केली होती धावपळीची यामुळे अनेकांनी अंदाज काढला. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची काहीतरी गडबड सुरु असल्याचे दिसत आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये देखील ठाकरेंच्या बाजूने निकाल लागेल, असा अंदाज लावला आहे. याच्या आधारावर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.
मी हिंदुत्वादी जरी असलो तरी मी देव भक्त आहे. मी कोर्टाला विनंती करू शकत नाही. मात्र मी देवाला प्रार्थना करू शकतो. राज्याचा सत्ता संघर्षाचा निकाल हा निकाल उद्धवजींच्या बाजूने लागू दे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर जे जाणार आहे त्याच्यावर काय बोलायचं? उर्वरित आमदार जे आहेत ते बाद होतील. मात्र, जे मस्तीत वागत होते, उद्धव साहेब, आदित्य साहेब, संजय राऊत साहेब यांना काहीही बोलत होते. ती मस्ती लोकांना पटली नाही. ती मस्ती आता रिकामी होईल, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.
