• Tue. Sep 8th, 2026

फडणवीसांच्या राष्ट्रवादीवरील टीकेवर अजित पवारांचं एका वाक्यात प्रत्युत्तर,म्हणाले..

फडणवीसांच्या राष्ट्रवादीवरील टीकेवर अजित पवारांचं एका वाक्यात प्रत्युत्तर,म्हणाले..

सातारा : भाजपच्या आमदारांनी कर्नाटकात प्रचार करणे हे समजले जाऊ शकते. पण, एकनाथ शिंदे हे त्यांच्या ४० आमदारांच्या गटाचे नेते आहेत. तसेच ते महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचे प्रतिनिधीही आहेत. दुसऱ्या राज्याचा प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यांत बळीराजा किती पीडित अवस्थेत आहे, याचे गांभीर्य ओळखून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, असा टोला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर देखील अजित पवार यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे. निवडणूक प्रचारातील विधाने फारशी गांभीर्यानं घ्यायची नसतात, असा टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला. सातारा दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

महाविकास आघाडी मजबूत असून जागा वाटपाच्या संदर्भात आम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ खडसे, जयंत पाटील अशी चर्चेची एक फेरी झाली आहे. घटक पक्ष काँग्रेस हा सुद्धा आमच्यासोबत आहे. आगामी काळात या वाटाघाटी केल्या जातील. मात्र, कोणत्याही राजकीय स्थित्यंतराचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं अशी खात्री विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असून हे पार्सल पुन्हा महाराष्ट्रात पाठवले जावे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ही निवडणुकीतील विधाने असून ती फारसे गांभीर्याने घ्यायची नसतात. आपल्या सरकारला धोका आहे, असे कोणी कसे म्हणेल.

३१ मार्चअखेर ठेकेदारांची बिले अद्याप मिळालेली नाहीत. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असून कायदा सुव्यवस्था गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात गुंतण्यापेक्षा बांधावर जाऊन बळीराजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवायला हवेत. शेतकऱ्यांच्या फळबागा आणि उन्हाळी पिके अवकाळी पावसामुळे वाया गेली आहेत त्यासाठी काही करता येईल का ते पाहावे, असं अजित पवार म्हणाले.
प्रवाशांसाठी मोठी बातमी! कर्जत-खोपोली लोकलच्या फेऱ्या तीन दिवस रद्द, वेळापत्रक जाणून घ्या

कर्नाटक निवडणुकीत काय निकाल लागेल हे आत्ताच सांगता येणार नाही. तेथे धार्मिक ध्रुवीकरण व भावनिक मुद्दा करुन तेथील राजकारण वेगळ्या मार्गाने नेण्याचे प्रयत्न आहेत. मात्र, संविधानाची बुज राखून पुढे जायला पाहिजे, असा सल्ला पवार यांनी दिला.

ठाणे-पुणे ई-शिवनेरीला प्रवाशांची पसंती कायम, मुंबई-पुणे प्रवासाची प्रतीक्षा कायम; कारण…

महाविकास आघाडी मतभेदाविषयी म्हणाले, असे अजिबात नाही, एखाद्या वृत्तपत्रात छापून येते ते त्यांच्या संपादकांचे मत असते.

विकासकामांची जत्रा हा भाजपचा प्रचार फंडा आहे काय, असे विचारले असता ते म्हणाले, या योजनेत पक्षाचा प्रचार कसा होईल हे पाहिले गेले आहे, असंही ते म्हणाले.
सावधान! मिठी नदीच्या पुराचा धोका कायम; दीड हजार कुटुंबांना पावसाची भीती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed