• Sat. Sep 21st, 2024

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर कार पेटली, वाहतूककोंडीने बोरघाटात वाहनांच्या १० किमीपर्यंत रांगा

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर कार पेटली, वाहतूककोंडीने बोरघाटात वाहनांच्या १० किमीपर्यंत रांगा

Mumbai Pune Expressway News : सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुन्हा जाम झाला आहे. मुंबई-पुणे मार्गावर तब्बल १० किमी लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

 

car caught fire on mumbai pune expressway
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर कार पेटली, वाहतूककोंडीमुळे वाहनांच्या दहा किमीपर्यंत रांगा
लोणावळा, पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कारला आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. बोरघाटात तब्बल १० किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग एवढी भीषण होती की त्यात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कार पेटल्यामुळे महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली. खोपोलीजवळ पुणे लेनवर ही दुर्घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.कारला आग कशामुळे लागली? याचे कारण आद्याप समोर आलेले नाही. पण कारमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, महाराष्ट्रातही परिणाम जाणवणार
शनिवार, रविवार व सोमवार असे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने खासगी वाहनांमधून पर्यटनासाठी घराबाहेर पडले. यामुळे आज भल्या पहाटेपासून मुंबई पुणे एक्सप्रेस-वे जाम झाला आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा बोगदा परिसरात महामार्ग पोलिसांनी दहा-दहा मिनिटांचा ब्लॉक घेत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने थांबवत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने सर्व सहा लेन वरून सोडली जात आहेत.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करताय! ही बातमी तुमच्यासाठी; महामार्ग पोलिसांकडून…
मुंबई-पुणे लेनवरी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पण दुसरीकडे पुणे-मुंबई लेनवर देखील वाहतूक कोंडी होत आहे. तर मुंबई-पुणे लेनवर खालापूर टोलनाक्यापासून खंडाळ्यापर्यंत प्रवासी वाहनांच्या रांगाच रांगा पहायला मिळत आहेत. पुढील तीन दिवस हीच परिस्थिती पहायला व अनुभवायला मिळणार आहे. भर उन्हात वाहतूककोंडी सोडवताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. ही वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली असल्याची भावना प्रवासी नागरिक व्यक्त करत आहेत. यावर प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी देखील आता होऊ लागली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed