• Sat. Sep 21st, 2024

कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेपर्यंत परशुराम घाट बंद, १००हून अधिक ST फेऱ्या रद्द

कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेपर्यंत परशुराम घाट बंद, १००हून अधिक ST फेऱ्या रद्द

रत्नागिरीःकोकणातील मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतुकीबाबत मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. २५ एप्रिल २०२३ ते १० मे या कालावधीत दुपारी १२.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंद कालावधीत केवळ हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी आंबडस पीरलोटे मार्गे वळवली जाणार आहे. या बंद कालावधीत एसटी बसेसच्या फेऱ्याही बंद राहणार आहेत तसेच लोटे एमआयडीसीत कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्याना घेऊन येणाऱ्या कंपनीच्या बसेसही बंद राहणार आहेत. त्यामुळे जवळपास एसटीच्या शंभरपेक्षा जास्ती फेऱ्या या रद्द कराव्या लागणार आहेत. या सगळ्याचा थेट मोठा फटका प्रवासीवर्ग व कर्मचाऱ्याना बसणार आहे.एसटी बसेसच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या तसेच लोकल फेऱ्याही रद्द कराव्या लागणार आहेत. त्यामूळे ऐन सुट्टीच्या वेळेतच प्रवाशांना व चाकरमान्याना प्रवासाचा त्रास सहन करावा लागणार आहे. या प्रवासाचा फटका जिल्ह्याचे एक टोक असलेल्या मंडणगड येथून जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी येथे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांनाही बसणार आहे. तसेच जिल्ह्यातील मोठे व महत्त्वाचे तालुके असलेल्या दापोली व खेड तालुक्यानाही याचा फटका बसणार आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत परशूराम घाटातील वाहतूक बंद राहणार असल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात एसटीतच बसून रहावे लागणार आहे. लोटे एमआयडीसीत फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट साठी येणाऱ्या कंपनीमध्ये कामासाठी येणाऱ्या खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे.

अजब कारभार! अधिकाऱ्याला निवृत्तीच्या दिवशी मिळाली पदोन्नती, थेट मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र
या सगळया पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी एसटी प्रवासी वर्ग व कंपन्यांमधील कामगार यांचे होणारे हाल लक्षात घेऊन चिरणी आंबडस पीर लोटे मार्गे एसटीबस सेवा सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी चिपळूण येथील एक सामजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत तसेच लोटे एमआयडीसीत काम करणारे कर्मचारी व प्रवासी वर्गाकडून करण्यात आली आहे.

सी-लिंकवर पहाटे बाईकची रेस लावली, दुचाकीतही फेरफार; पोलिसांनी २० जणांच्या मुसक्या आवळल्या
या बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतुक चीरणी- आंबडस- चिपळूण मार्गे वळविणेबाबतची कार्यवाही खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात यावी. परशुराम घाटातील वाहतुक दुपारी १२.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवणे व बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चीरणी आंबडस- चिपळूण मार्गे वळविणेबाबतची कार्यवाही उपविभागीय दंडाधिकारी खेड व चिपळूण, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड व चिपळूण, आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, विभाग पेण-रायगड, व रत्नागिरी यांनी संयुक्तपणे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

१० वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबद्दल अजित पवारांची नाराजी; गडकरींना भेटण्याचा सल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed