• Mon. Mar 16th, 2026

    धारावीत बापाकडून गर्लफ्रेंडसाठी चिमुकल्याची हत्या, पोलिसांच्या प्रश्नांच्या फैरींनी गडबडला अन्…

    धारावीत बापाकडून गर्लफ्रेंडसाठी चिमुकल्याची हत्या, पोलिसांच्या प्रश्नांच्या फैरींनी गडबडला अन्…

    Dharavi Murder Case | धारावीत एका व्यक्तीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला. यानंतर आपल्याला काहीच माहिती नसल्याचा बनाव करत तो पोलिसांसोबत मुलाचा शोध घेत फिरत होता.

     

    धारावीत वडिलांनी दोन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा आवळला
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:धारावीच्या शाहूनगर परिसरात दोन वर्षांच्या मुलाची हत्या करून प्लास्टिकच्या गोणीतून त्याचा मृतदेह फेकल्याची घटना उघडकीस आली. असद अन्सारी असे या मुलाचे नाव असून शाहूनगर पोलिसांनी त्याचे वडील रेहमत अली अन्सारी यालाच हत्येप्रकरणात अटक केली. विवाहबाह्य संबंधामध्ये अडसर ठरत असल्याने रेहमत याने मुलाची हत्या केली. प्रेयसीच्या सांगण्यावरून तो पत्नीचीही हत्या करण्याच्या विचारात होता, असेही चौकशीतून पुढे आले आहे.धारावीच्या हयात कंपाऊंडमध्ये रेहमत अन्सारी दोन भाऊ, पत्नी आणि इतर कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री असद हा चॉकलेटसाठी रडत होता. ते पाहून रेहमत आपल्या दोन भावांच्या मुलांना आणि असद याला घेऊन जवळच्या दुकानात गेला. या ठिकाणी काही वेळ काढल्यानंतर त्याने भावांच्या मुलांना घरी पाठवले आणि असद याला घेऊन त्यांच्या पुठ्ठे विक्रीच्या दुकानात गेला. दुकानात दोघेच असल्याची संधी साधत त्याने असदचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर दुकानातील प्लस्टिक पिशवीत त्याचा मृतदेह गुंडाळून मिठी नदीच्या पात्रात फेकून दिला. घरी आल्यानंतर असद सोबत नसल्याने पत्नीने विचारले असता, तो कुठे गेला, याबाबत माहित नसल्याचे रेहमत याने सांगितले.

    अन्सारी कुटुंबीयांसह सर्वांनीच असद याचा शोध सुरू केला. रात्रभर शोध घेतल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास मिठी नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह सापडला. असद शेवटी रेहमत याच्यासोबत दिसल्याने पोलिसांनी त्यालाच चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या रेहमत याच्यावर पोलिसांनी उलटसुलट प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे अखेर त्याने असदची हत्या केल्याची कबुली दिली. प्रेयसीच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. प्रेयसीचे कुटुंबीय तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते. पत्नी आणि मुलगा असल्याने तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, असे तिने रेहमतला सांगितले. त्यामुळेच त्याने हे कृत्य केले.

    आरोपीही शोधमोहिमेत

    असद कुठे गेला, याबद्दल काहीच माहिती नसल्याचे दाखवत रेहमतदेखील कुटुंबातील इतरांप्रमाणे त्याचा शोध घेऊ लागला. असद गायब झाल्याची घोषणा मशिदीतील भोंग्यातूनही करण्यात आली. असद बेपत्ता झाल्याचे भासविण्यासाठी रेहमतने जाणूनबुजून डोळ्यात पाणीही आणले. मात्र त्याचा हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed