• Sat. Jun 20th, 2026

    चार वर्षांपूर्वी आई घर सोडून गेली, मुलं आठवणीने व्याकुळ, माऊलीच्या ओढीने घरातून निघाली पण..

    चार वर्षांपूर्वी आई घर सोडून गेली, मुलं आठवणीने व्याकुळ, माऊलीच्या ओढीने घरातून निघाली पण..

    राजापूर/रत्नागिरीःचार वर्षांपूर्वी घर सोडुन पुण्याला गेलेल्या आईची आठवण येत होती. आईच्या आठवणीत व्याकूळ झालेली मुलं न सांगता घराबाहेर पडली. अल्पवयीन मुलं घरातून निघून गेल्याने मोठी खळबळ उडाली. घरच्यांनीही त्यांची शोधाशोध सुरु केली होती. मात्र दैव बलवत्तर म्हणून योगायोगाने राजापूर एसटी स्टँड समोर एका बाजूला बसलेली मुले राजापूर महिला पोलिसांच्या दामिनी पथकाला दिसली आणि पुढचा अनर्थ टळला. महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने सतर्कता दाखवत चौकशी करून त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात सुरक्षितरित्या दिले आहे.विशेष म्हणजे घरातून न सांगता निघालेल्या मुलांची शोधा शोध घरच्यांनी सुरू केली होती. पण पोलिसांत तक्रार मात्र केली नव्हती. दामिनी पथकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळ हा सगळा प्रकार समोर आला आहे.

    सोमवारी लांजा तालुक्यातील वाघण बौद्धवाडी येथील येथील राहणारे कुमारी साघवी महेंद्र जाधव वय-१५ ,यथात महेंद्र जाधव वय-१३ वर्ष ही दोन अल्पवयीन मुले आज सोमवारी संध्याकाळी राजापूर एस.टी.डेपो समोर एका बाजुस बसलेली दिसली. यावेळी राजापूर पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार हर्षदा चव्हाण व महिला पोलीस कॉन्स्टेबल सुषमा स्वामी यांनी या मुलांकडे विचारणा केली. यावेळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.

    पुणेःलग्नाआधीच गर्भवती, टॉयलेटमध्ये बाळाला जन्म देत खिडकीतून खाली फेकले, १९ वर्षांच्या तरुणीचे कृत्य
    दामिनी पथकातील पोलिसांनी यावेळी मुलांची विचारपूस केली, तेव्हा आमची आई चार वर्षापुर्वी घर सोडुन गेली आहे ती पुणे येथे असुन आम्हाला तिची आठवण येत असल्याने तिच्याशी संपर्क करुन आम्ही पुणे येथे जात आहोत, असे सांगितले. यावेळी त्यांना वडीलांचे नाव विचारले असता मुलांनी महेंद्र गणपत जाधव रा.वाघण गाव बौद्धवाडी ता.लांजा असे असल्याचे या मुलानी सांगितले.

    वडिल कोकण रेल्वेत कामाला आहेत असल्याचेही या मुलांनी सांगितले. यानंतर दामिनी महिला पोलीसांच्या पथकाने तात्काळ वडिलांसोबत फोनवर संपर्क करुन बोलावून घेतले. वडील आल्यावर दामिनी पथक मुलांना व वडीलांसह घेऊन पोलीस ठाण्यात घेवून आले. राजापूर पोलीस निरिक्षक जनार्दन परबकर यांनी मुलांना व वडीलांना समजावून सांगितले व मुलांचे मतपरिवर्तन करुन दोन्हीही मुलांना सुरक्षितरित्या त्यांचे वडील महेंद्र गणपत जाधव व चुलते शिलेंद्र यांच्या ताब्यात देण्यात आले.

    जुन्या भांडणाचा राग, महिलेचा विनयभंग करत विष पाजले, पीडीतेची मृत्यूशी झुंज; नातेवाईकांचा दावा
    तसंच, त्यांना मुलांचे योग्य प्रकारे पालन पोषण करुन सांभाळ करण्याबाबात योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. राजापूर पोलिसांच्या महिला दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे घरातून न सांगता निघालेली मुले पुन्हा घरी सुखरूप परतली आहेत. यामुळे दामिनी पथकाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

    व्हॅलेंटाईन डे दिवशी जन्मोजन्मीची गाठ बांधली, पाहुण्यांच्या हटके स्वागताने नवदाम्पत्याने मनं जिंकली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed