या बसमध्ये प्रवास करणारे सर्व मुलं-मुली ही तिशीच्या आतमधील आहेत. प्रत्येक जण आपल्या घरासाठी काही तरी करता यावे यासाठी काम करतात, शिक्षण घेऊन हे वाजवण्याची कामे करतात. काही जणांवर आपल्या कुटुंबाची जबाबदारी असल्याची माहिती देखील जवळच्या नातेवाइकांनी दिली आहे. आपणही काही तरी करावे यासाठी या पथकत वाजवण्याची कामे करतात. या अपघाताने सेवा सामान्य घरातील मुलांचे मोठे नुकसान झाले असून ही हानी कधीही भरून न येणारी आहे. अनेकांनी आपल्या मनाशी बाळगली स्वप्न अपूर्ण राहिल्याचा भावना मनाशी घर करून ठेवल्या. या पथकातून कुणाचा कॉलेजचा खर्च, कुणाचा घराला हातभार मिळत असे. मात्र, अचानक झालेल्या अपघातानं सर्वांनाच सुन्न केलं. आई वडिलांच्या हाताखाली आलेल्या मुलांना त्यांना डोळ्यादेखत पहावा लागलं. या अपघाताने राज्यासह देशातून हळहळ व्यक्त होत आहे.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख
या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केले. त्यांनी ट्विटवरुन आपला शोकसंदेश प्रसिद्ध केला. महाराष्ट्रात रायगड येथे झालेल्या बस दुर्घटनेने व्यथित झालो आहे. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. अपघातात जखमी झालेले लवकर बरे होतील अशी मी आशा व्यक्त करतो. अपघातग्रस्तांना राज्य सरकार शक्य ती सर्व मदत करत आहे. रायगड अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफमधून रु. २ लाख आणि जखमींना रु. ५०,००० अशी मदत पुरवण्यात येईल, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.