• Sat. Sep 21st, 2024

पत्नीचं निधन, तिच्या विना कसं जगायचं? पुलावर काही वेळ थांबला, विरहातून पतीने जीवन संपवलं

पत्नीचं निधन, तिच्या विना कसं जगायचं? पुलावर काही वेळ थांबला, विरहातून पतीने जीवन संपवलं

जळगाव : करोनामुळे दोन वर्षांपूर्वी पत्नीचा मृत्यू झाला. पण तिच्या विना कसं जगायचं या विवंचनेत आणि पत्नीच्या विरहात पतीने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बांभोरी येथील गिरणा पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता घडली. शाम प्रताप भील (वय ३० रा.फुलफाट-टाकळी ता. धरणगाव ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणी नातेवाईकांनी माहिती दिली आहे. या माहितीनुसार करोनामुळे दोन वर्षांपूर्वी शाम याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर शाम हा गावापासूनअलीप्त झाला होता. गुरुवारी दिवसभर मजुरीचे काम केल्यानंतर संध्याकाळी बांभोरी पुलावर काही वेळ थांबला. काही वाहनधारकांनी शाम आत्महत्या करण्याचा विचारात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला पुलावरून बाहेरही नेले होते.

तिघांना गळ्यात गळे घातलेलं पाहून मित्र हादरला; वडील गेले, आई अन् मुलाची मृत्यूशी झुंज
बाहेर नेल्यावर काही वेळानंतर शाम पुन्हा पुलावर आला आणि पुलावरून थेट गिरणा नदीपात्रात उडी घेतली. पुलावरून पडल्यानंतर शामचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती तालुका पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे, चेतन पाटील, होमगार्ड अशोक वाघ यांनी यांनी घटनास्थळी भेट दिली. आणि पंचनामा केला. दरम्यान, याठिकाणी काम करणाऱ्या काही वाळू उपसा करणाऱ्या मजुरांमुळे ओळख पटली. त्यानुसार पोलिसांनी टाकळी येथील शामच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

शेंदूर अन् लोण्यापासून बनलेली हनुमानाची सुंदर मूर्ती; उन्हाळ्यातही वितळत नाही लोणी

मोठ्या भावाच्या मृत्यूने लहान भावावर दुःखाचा डोंगर

शामच्या पश्चात लहान भाऊ व दोन विवाहीत बहिणी असा परीवार आहे. शामचे आई-वडील दहा वर्षांपूर्वीच आजारपणामुळे वारले आहेत. त्यामुळे शाम आपल्या भुरा भील या लहान भावासोबत गावात राहत होता. सकाळी मजुरी करून दोन्ही भाऊ आपला उदरनिर्वाह करत होते. आई वडिलांनंतर मोठा आधार असलेल्या शामच्या मृत्यूमुळे त्याचा लहान भाऊ भुरा भील यांच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed