कुरुंदवाड येथील विकास आराखड्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठीचा दावा कुरुंदवाड येथील फिर्यादी वसंत संकपाळ यांनी दाखल केला होता. १९८३मध्ये रस्त्याकरीता संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला द्यायला विलंब केला. यामुळे १९८४ पासून तक्रारदार जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करत होते.
२०१९ उजाडले तरीही जमिनीच्या बदल्यात कुठलाही मोबदला न दिल्याने अखेर जयसिंगपूर दिवाणी न्यायालयाने तीन महिन्याच्या आत रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. मात्र तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. म्हणून कोर्टाने अखेर जिल्हाधिकाऱ्यांना फटकारलं आणि प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे काढले आहे, अशी माहिती फिर्यादी वसंत संकपाळ यांचे वकील देवराज मगदूम यांनी दिली आहे.
ढोल ताशाच्या गजरात चैत्र यात्रेला सुरूवात; लाखो भाविकांनी जोतिबाच्या डोंगर फुलला
दरम्यान, संकपाळ यांच्या वकीलांनी न्यायालयाच्या आदेशासह दुपारी १२ च्या सुमारास कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील जंगम मालाची यादी दिली असून यात कार्यालयातील २ कॉम्प्युटर, २ टेबल आणि कपाट, मुख्य जिल्हाधिकारी यांची खुर्ची, ४ फॅन कुलर आणि जिल्हाधिकारी यांची गाडी असे एकूण ३,९०,०० रुपये किमतीचे वस्तू जप्त करावे, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानूसार ही जप्तीची प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकारी आणि वकील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने वकील आणि फिर्यादी जिल्हाधिकारी येण्याची वाट पाहत आहेत. जप्तीची कारवाई होणार का? हे ही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अशा पद्धतीची कारवाई झाल्याने सरकारी कार्यालयात मात्र खळबळ उडाली आहे.