• Mon. Mar 16th, 2026

    हात-पाय धुण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरले, इतक्यात पाय घसरला; दोन मित्रांचा दुर्दैवी अंत

    हात-पाय धुण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरले, इतक्यात पाय घसरला; दोन मित्रांचा दुर्दैवी अंत

    सांगली: मिरजेच्या बेडग येथे पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हैसाळ कॅनॉलमध्ये हात पाय धुण्यासाठी उतरले असता पाय घसरुन सलमान तांबोळी आणि आरमान मुलाणी हे दोन तरुण वाहून जाऊन मृत्यूमुखी पडले आहेत तर नदीम मुलाणी हा तरुण या घटनेत बचावला आहे.मिरज तालुक्यातल्या बेडग येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. त्यावेळी एक तरुण वाहून जात असताना त्याला ग्रामस्थांनी वाचवला आहे. सलमान तांबोळी, वय २१ आणि आरमान मुलाणी, वय १६ असे मृत तरुणांची नावे आहेत. तर नदीम मुलाणी वय १६ याला वाचवण्यात यश मिळाला आहे.

    याबाबतची अधिक माहिती, याप्रमाणे सांगलीच्या माधवनगर येथील मंगळवार पेठेतील रहिवासी असणारे सलमान तांबोळी, अरमान मुलाणी, नदीम मुलाणी आणि कुलदीप मौर्य हे चौघे जण रंगकाम करतात. मंगळवारी चौघेजण पीओपी कामाच्या निमित्ताने बेडग -मंगसुळी या ठिकाणी गेले होते. काम सुरू असताना या ठिकाणाहून जाणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या मुख्य कालव्यामध्ये उन्हाळा असल्याने चौघांनी हात पाय धुण्याचे ठरवलं, यामध्ये सलमान तांबोळी आणि आरमान मुलाणी हे दोघेही कालव्यात उतरले त्यांच्या पाठोपाठ नदीम देखील यावेळी कालव्यात उतरला.

    नवी मुंबईकरांना उन्हाळ्यात गारेगार प्रवासाची संधी?; मेट्रो१ लवकरच धावणार, स्थानके व तिकिट दर जाणून घ्या
    कालव्यात सलमान आणि आरमान या दोघांचाही हातपाय धुताना पाय घसरला आणि दोघेजण पाण्यात वाहू लागले त्याचबरोबर नदीमदेखील यावेळी पाण्यात पडला आणि तिघे या ठिकाणी वाहत जाऊ लागले. दरम्यान आरडाओरडा झाल्याने आसपासच्या ग्रामस्थांनी येऊन नदीम मुलाणी याला तातडीने वाहून जात असताना कालव्यातून बाहेर काढले. मात्र पाण्याचा प्रचंड वेग असल्याने सलमान आणि आरमान हे दोघे जण वाहून गेले.

    रणनीतीसाठी ‘सल्ला’! शिवसेनेकडून कंपनीची नेमणूक, तळागाळापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न
    मिरज ग्रामीण पोलिसांनी आणि आयुष हेल्पलाइन टीम या पथकाकडून घटनास्थळी धाव घेत वाहूनगेलेल्या अरमान आणि सलमान या दोघांचाही मृतदेह शोधण्याचे काम सुरू केलं होतं. मात्र म्हैसाळ सिंचन योजनेचा आवर्तन सुरू असल्याने या ठिकाणी कालव्यामध्ये पाण्याचा प्रचंड वेग असल्याने मृतदेह शोधण्याच्या कामात मोठा अडथळा निर्माण येत होता. त्यामुळे अखेर म्हैसाळ सिंचन योजनेचे पंपग्रह बंद करण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली.

    शिर्डीतील रामनवमी यात्रेत ब्रेक डान्स पाळणा अचानक तुटला; पाच जण गंभीर जखमी, चालकाचा हलगर्जीपणा

    तब्बल १४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आयुष हेल्पलाइन टीमने मृत सलमान तांबोळी आणि आरमान मुलाणी या दोघांचाही मृतदेह शोधून काढले आहेत. सदर घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed