अहमदनगर: एसटीने प्रवास करण्यासाठी विविध घटकांना आधीपासूनच सवलती देण्यात आलेल्या आहेत. आता महिलांना प्रवास भाड्यात सवलत दिल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही गर्दी पेलण्याची क्षमता सध्याच्या व्यवस्थेत नसल्याने नियमित प्रवासी आणि सवलतीचे प्रवासी यांनाही त्रास आणि विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सवलती वाढल्या तशी यंत्रणाही वाढवावी, अशी मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना पत्र लिहून काही सूचना केल्या आहेत.हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे, राज्यसरकारने नुकताच महिलांसाठी मोफत प्रवास सुरू केला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना ६५ वर्षानंतर अर्धे तिकीट व ७५ नंतर मोफत अशा सुविधा दिल्या आहेत. पण ज्या गाडीत इतके वृध्द नागरिक व महिला आता मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणारी पासधारक तरुण मुलांची व इतर पुरुषांची संख्या खूप मोठी आहे. अगोदरच बसेसची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे गर्दी खूप असते. एकदा बस आली की ही तरुण मुले बॅग खिडकीतून आत टाकतात. त्यामुळे निम्म्या बसमधील जागा अडून जातात. काही मुले चालकाचे दार उघडुन आत घुसतात. या ढकला ढकलीत वृद्ध व महिलांना जागा मिळत नाही व आत घुसताना होणाऱ्या गर्दीत अनेकजण जखमी होतात.
तीन मुलींच्या पाठी मुलाचा जन्म, तरीही घरात आनंद नाही, कारण ठरली लेकाची जन्मरास, बापाचा भलताच गैरसमज
यावर उपाय सूचविताना कुलकर्णी यांनी म्हटले आहे, सवलती देताना त्या प्रमाणात बसेसची संख्या तातडीने वाढवण्याची गरज आहे. मुंबईत बेस्ट प्रवासी जसे बस येण्याअगोदर रांगेत उभे राहतात तशा रांगा फलाटावर करण्याचा नियम करून रांगेत आत जाण्याचा नियम करावा. प्रवाशांनी उतरताना खिडकीची काच लावण्याचे वाहकाने सतत सांगितले तर बॅग, पिशवी टाकून जागा धरण्याचे प्रकार थांबतील त्यातून अनेकदा मारामारी होते. इतके हे गंभीर आहे. प्रत्येक स्टँड वर आपण नेमलेले डेपोचे वॉचमन यांना अशा रांगा करणे,खिडकीतून आत जाणे असे प्रकारात लक्ष घालण्याचे काम देऊ शकता. रांग न केल्याने त्या गर्दीत चोरीचे प्रमाण खूपच मोठे आहे. या सूचना एस टी लिहिणे व सतत माईकवर टेप करून ऐकवणे सहज शक्य आहे. सवलती देताना सुरक्षित व सुलभ प्रवासाची हमी देणेही गरजेचे आहे. थोडे दिवस लागतील पण त्यातून एक शिस्त प्रवाशांना येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महिलांसाठी गुड न्यूज; ST पाठोपाठ खाजगी ट्रॅव्हल्सकडून 50 टक्के सूट