मुलगा जन्मताच त्याची कुंडली काढली अन् तिच्या नशीबाचे चक्रच फिरले. जन्माला आलेला मुलगा हा तृतीयपंथी असल्याचं पती, सासू-सासरे यांनी गैरसमज करून घेऊन तिचा छळ मांडला.जन्माला आलेलं मूल हे सुदृढ असल्याचा विवाहिता व तिच्या आई-वडिलांचे म्हणणं आहे. आज सर्व जग विज्ञान युगात वावरत असताना इतक्या वैद्यकीय सुविधा असताना राशी कुंडलीवरून तो जन्माला आलेला मुलगा तृतीयपंथी असल्याचा गैरसमज सासरच्यांनी करून घेतलाय. यामुळे समाजात होणारी बदनामी किती दिवस सहन करायची, अशी खंतही तिचे आई-वडील व्यक्त करतायत.
विवाहितेचा पती हा माजी सैनिक असल्याचे कळतंय. त्याच्या या कृत्यामुळे विवाहितेचे आई-वडील काळजीत आहेत. आपल्या मुलीसह आपल्या जीवालाही धोका असल्याचे ते बोलत असल्याची चर्चा आहे. कोणती अघटित घटना घडेल काय, या विचाराने ते अस्वस्थ आहेत. रात्ररात्र त्यांना झोपही लागत नाही, इतकी त्यांनी या घटनेची धास्ती घेतलीय. या घटनेनंतर विवाहिता आपल्या आई-वडिलांकडे दोन मुलांसह राहतेय. न्याय मिळावा म्हणून तिने आता पोलिसांकडे धाव घेतलीय. झालीय.
संबंधित विवाहित महिलेने पती, सासू, सासरे हे संगनमत करुन त्रास देतायेत. पहिल्या तीन मुली झाल्या आहेत. आता चौथा मुलगा झाला असला तरी तो कन्या राशीचा असल्याने तो तृतीयपंथी असणार, असा गैरसमज त्या तिघांनी करून घेतलाय. तसेच हॉटेल व्यवसायासाठी दीड लाख रुपये घेवून ये, या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी केली जातेय. तसेच वेळोवेळी उपाशी ठेवून, लाथाबुक्यांनी मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ केला जातोय. दि. ३ मार्च २०१२ ते ६ मार्च २०२३ या कालावधीत या घटना घडल्या असल्याचा पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार एस. एस. भोसले करत आहेत.
२०२० साली सेवानिवृत्त, तरी नागरिकांसाठी नांदेडच्या वाहतूक पोलिसाची दररोज विनाशुल्क सेवा