• Sat. Sep 21st, 2024

तीन मुलींच्या पाठी मुलाचा जन्म, तरीही घरात आनंद नाही, कारण ठरली लेकाची जन्मरास, बापाचा भलताच गैरसमज

तीन मुलींच्या पाठी मुलाचा जन्म, तरीही घरात आनंद नाही, कारण ठरली लेकाची जन्मरास, बापाचा भलताच गैरसमज

साताराः पहिल्या तीन मुली झाल्यानंतर चौथा मुलगा झाला पण तरीही कुटुंबात आनंद पसरलाच नाही. मुलगा कन्या राशीचा जन्मलाय म्हणून तो तृतीयपंथी असणार असा गैरसमज ठरवून पती, सासू, सासऱ्यांनी विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ मांडल्याचा प्रकार समोर आला आहे. या रोजच्या कटकटीला कंटाळून विवाहितेन न्यायाचा मार्ग स्वीकारला असून तिन पोलिसात धाव घेतलीय. ही दुर्दैवी घटना खटाव तालुक्यातील एका गावात घडलीय.पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ मार्च २०१२ ते ६ मार्च २०२३ या कालावधीत विवाहितेचा छळ केल्याचे तक्रारीत म्हटलंय. गेली दहा- अकरा वर्षे पती वारंवार हिचा छळ करत आहे. चारित्र्यावर संशय घेणे, मारहाण करणे या गोष्टी नित्याच्याच घडत आहेत. मात्र, समाज काय म्हणेल या भीतीपोटी हे सगळं सहन केल्याचं ती सांगते. काही वेळा तर तीन नेहमीच्या कटकटीला कंटाळून आपल्या मुलींसह आत्महत्या करण्यास सुद्धा निघाली होती, पण आत्महत्या केली तर आपले आई-वडिलांची इज्जत जाईल या भीतीपोटी तिने हा विचार सोडून देऊन होणाऱ्या नेहमीच्या जाचाला सामोरे जात सहन करत राहिली. व्यसनाधीन नवऱ्याच्या भीतीने ती कायमच तोंड बंद ठेवलं. आता त्यांना तीन मुलींच्यापाठी एक मुलगाही झालाय. पण विज्ञान युगात राशी कुंडलीत अडकलेल्या लोकांना मुलगा झाल्याचा आनंद मात्र काही झाला नाही.

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मुलींच्या लग्नाची चिंता, हतबल बापाने घेतलेला निर्णय पाहून सगळेच हादरले
मुलगा जन्मताच त्याची कुंडली काढली अन् तिच्या नशीबाचे चक्रच फिरले. जन्माला आलेला मुलगा हा तृतीयपंथी असल्याचं पती, सासू-सासरे यांनी गैरसमज करून घेऊन तिचा छळ मांडला.जन्माला आलेलं मूल हे सुदृढ असल्याचा विवाहिता व तिच्या आई-वडिलांचे म्हणणं आहे. आज सर्व जग विज्ञान युगात वावरत असताना इतक्या वैद्यकीय सुविधा असताना राशी कुंडलीवरून तो जन्माला आलेला मुलगा तृतीयपंथी असल्याचा गैरसमज सासरच्यांनी करून घेतलाय. यामुळे समाजात होणारी बदनामी किती दिवस सहन करायची, अशी खंतही तिचे आई-वडील व्यक्त करतायत.

विवाहितेचा पती हा माजी सैनिक असल्याचे कळतंय. त्याच्या या कृत्यामुळे विवाहितेचे आई-वडील काळजीत आहेत. आपल्या मुलीसह आपल्या जीवालाही धोका असल्याचे ते बोलत असल्याची चर्चा आहे. कोणती अघटित घटना घडेल काय, या विचाराने ते अस्वस्थ आहेत. रात्ररात्र त्यांना झोपही लागत नाही, इतकी त्यांनी या घटनेची धास्ती घेतलीय. या घटनेनंतर विवाहिता आपल्या आई-वडिलांकडे दोन मुलांसह राहतेय. न्याय मिळावा म्हणून तिने आता पोलिसांकडे धाव घेतलीय. झालीय.

किराणा सामान उधार दिले नाही म्हणून दिला मानसिक त्रास, वैतागलेल्या मालकाने उचलले टोकाचे पाऊल
संबंधित विवाहित महिलेने पती, सासू, सासरे हे संगनमत करुन त्रास देतायेत. पहिल्या तीन मुली झाल्या आहेत. आता चौथा मुलगा झाला असला तरी तो कन्या राशीचा असल्याने तो तृतीयपंथी असणार, असा गैरसमज त्या तिघांनी करून घेतलाय. तसेच हॉटेल व्यवसायासाठी दीड लाख रुपये घेवून ये, या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी केली जातेय. तसेच वेळोवेळी उपाशी ठेवून, लाथाबुक्यांनी मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ केला जातोय. दि. ३ मार्च २०१२ ते ६ मार्च २०२३ या कालावधीत या घटना घडल्या असल्याचा पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार एस. एस. भोसले करत आहेत.

काळीज पिळवटून टाकणारी घटना: आधी कॅन्सरने पतीचं निधन; आता आईसह दोन लेकरांचे विहिरीत मृतदेह

२०२० साली सेवानिवृत्त, तरी नागरिकांसाठी नांदेडच्या वाहतूक पोलिसाची दररोज विनाशुल्क सेवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed