मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळाबाबत फक्त चर्चा झाली, ठोस निर्णय घेतला नाही, पालकमंत्री शेतकऱ्यांकडे फिरकले नाहीत. शेतकरी संकटात असताना सरकार वेळकाढूपणा करीत आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.
Pankaja Munde: तिकडे कोणी काजू, बदाम खाण्यासाठी गेले नव्हते; पंकजा मुंडेंनी विरोधकांना फटकारलं‘शेतकऱ्यांना पैसेच नाहीत’
भाजप महायुती सरकार संवेदनशील नाही. शेतकरी संकटात होरपळून निघाला असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कुंभमेळ्यात सीसीटीव्ही बसवण्यासाठी सरकार ३५० कोटी रुपये खर्च करते, परंतु शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची गरज असताना तोही निर्णय घेतला नाही.
‘महायुतीबद्दल ल चीड’
लोकांमध्ये महायुती सरकारबद्दल प्रचंड चीड आहे; परंतु सत्ताधारी निर्ढावलेले आहेत. त्यांना शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे काहीही देणेघेणे नाही. यांना फक्त भ्रष्टाचार व टक्केवारी यामध्येच स्वारस्य आहे. अजून वेळ गेलेली नाही, सणासुदीचे दिवस आहेत, सरकारने तत्काळ दुष्काळ जाहीर करून दसऱ्याच्या आधी भरीव मदत द्यावी,’ असे सपकाळ म्हणाले.
UPI Charges On Rail Tickets: रेल्वे प्रवाशांवर ‘यूपीआय’ शुल्कभार; 2000 रुपयांपुढील तिकीट-पाससाठी 5 रुपयांहून अधिक भुर्दंड‘वाढदिवसाला दिवे का?’
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षांत काय दिवे लावले; म्हणून त्यांच्या वाढदिवसाला दिवे लावण्याचे आवाहन केले होते? मोदींच्या काळात तरुणांना नोकऱ्या नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी संकटात आहे, अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे, महागाई गगणाला भिडली आहे, अशा परिस्थितीत वाढदिवस काय साजरा करता,’ असा प्रश्नही त्यांनी केला.
हा आत्मपूजेचाच प्रकार
‘नागरिक संकटात असताना वाढदिवस साजरे करणे हे अशोभनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सोने खरेदी करू नका, विदेशात जाऊ नका, तेल कमी वापरा, काटकसर करा, असे आवाहन केले होते आणि आपल्या वाढदिवसाला तेलाचे दिवे लावा, असे सांगितले, हा प्रकारच संतापजनक आहे. आत्मपूजा करण्याचा हा प्रकार आहे. देशाला इतका खोटारडा, रंग बदलणारा पंतप्रधान मिळाला हे दुर्दैव आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
