• Sun. Sep 20th, 2026

Mumbai Kalachowki Girl Dies of Electric Shock : मुंबईच्या काळाचौकी येथील महागणपती येथे 5 जणांना विद्युत शॉक लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत आठ वर्षीय चिमुलकीचा मृत्यू झाला आहे.

काळाचौकी विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : यंदाच्या मुंबईतील गणेशोत्सवात सुरु असलेली विघ्नांची आणि संकटांची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. मुंबईतील यंदाच्या गणेश आगमन सोहळ्यात काही गणेशमूर्ती कोसळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता दक्षिण मुंबईतील काळाचौकीचा महागणपती मंडळाच्या परिसरात वीजेचा झटका लागून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर पाच जण जखमी आहेत.

नेमकी घटना काय?

प्राथमिक माहितीनुसार, काल शनिवारी रात्री उशीरा काळाचौकीचा महागणपतीच्या मंडप परिसरात ही घटना घडली. काल मध्यरात्री भाविक मोठ्याप्रमाणावर काळाचौकीचा महागणपतीच्या दर्शनाला आले होते. याठिकाणी वीजेचा झटका लागून पाच जण जखमी झाले. यामध्ये लहान मुलांचा आणि तरुणांचा समावेश आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं. दुर्घटनेत जखमी झालेल्या पाच जणांना तातडीने जवळच्या मसीना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. तर प्रकृती गंभीर असलेल्या एका मुलीला उपचारासाठी परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Maharashtra TimesMaharashtra Rain Forecast: राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; कोणत्या भागांत कोसळणार? हवामान खात्याचा ताजा अंदाज

आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

वीजेचा झटका लागून जखमी झालेल्यामध्ये दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. हे सर्वजण 8 ते 20 या वयोगटातील आहेत. जखमींपैकी आठ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मसीना रुग्णालयात नेण्यात आलेल्या तिघांवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्वजण याच परिसरात वास्तव्याला होते. या सर्व मुलांना वीजेचा झटका कसा लागला, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, या दुर्घटनेमुळे लालबाग-परळमध्ये दु:खाचं सावट पसरलं आहे.

… पुढच्या वर्षी लवकर या

गेले सहा दिवस घरोघरी निर्माण झालेल्या चैतन्यपूर्ण वातावरणाला आता पुढच्या गणेशोत्सवापर्यंत अल्पविराम मिळाला आहे. शनिवारी भावपूर्ण वातावरणात भाविकांनी गौरी-गणपतींना निरोप दिला. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित करण्याचे निर्बंध असल्याने एरवी चौपाटीवर उसळणारी गर्दी कृत्रिम तलावांवर उसळली होती. चौपाटीवर मावळत्या सूर्याच्या साक्षीने वाळूमध्ये मूर्ती ठेवून केली जाणारी आरती, कृत्रिम तलावांच्या परिसरामध्ये भाविकांनी केली. त्यामुळे मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत समुद्रामध्ये मूर्ती विसर्जनाचा भावपूर्ण क्षण कुठेतरी हरवल्याचीही खंत भाविकांकडून व्यक्त करण्यात येत होती.

Maharashtra TimesWeather Update : मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु, शेतकऱ्यांना दिलासा नाहीच, हवामान विभागाने अखेर घोषणा केलीच; वाचा पावसाचा अंदाज नेमका काय?

फटाके फोडत भाविकांची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

सकाळपासून घरोघरी महाआरती आणि उत्तरपूजा करून गणपती बाप्पा आणि गौरी मातांना नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर पारंपारिक वेशभूषेत, गुलालाची उधळण करत आणि टाळ-मृदंगाच्या तालावर नाचत भाविक विसर्जन मिरवणुकीसाठी घराबाहेर पडले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरामध्ये आणि फटाके फोडत भाविकांनी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. प्रत्यक्ष विसर्जन स्थळी आल्यानंतर मात्र जयघोषाचा हा आवाज कमी झाला होता. यंदा घरगुती गणपती विसर्जनासाठी दादर, गिरगाव यासारख्या परिसरात संध्याकाळपर्यंत ढोलताशांचा आवाज फारसा नव्हता, असे निरीक्षण स्थानिकांनी नोंदवले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा