Weather Update : मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु, शेतकऱ्यांना दिलासा नाहीच, हवामान विभागाने अखेर घोषणा केलीच; वाचा पावसाचा अंदाज नेमका काय?
देशातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याचे शनिवारी भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून मान्सून माघारी फिरला आहे. राजस्थानच्या आणखी काही भागांतून, तसेच पंजाब, सौराष्ट्र, कच्छ येथून आणखी तीन-चार दिवसांमध्ये मान्सून माघार घेईल, अशी चिन्हे दिसत आहेत.