• Mon. Sep 14th, 2026

Mumbai Ganeshotsav 2026: विघ्नहर्त्याची कृपा‘वृष्टी’! गणरायाच्या स्वागताचा उत्साह शिगेला; मंगलमय वातावरणात भक्तिरंगाची उधळण

Mumbai Ganeshotsav 2026: छत्र्या आणि रेनकोटच्या आडून मुंबईकरांनी बाजारपेठ गाठत गणेशोत्सवासाठीची शेवटच्या टप्प्यातील खरेदी उरकली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारीची लगबग सुरू असतानाच रविवारी मुंबई, महामुंबई परिसरातील आकाशात कृष्णमेघांनी गर्दी केली आणि विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी निसर्गानेच जणू मंगलाभिषेक सुरू केला. गणरायाच्या आगमनाला अवघे २४ तास उरले असताना बरसलेल्या या सुखसरींनी वातावरणात भक्तिरंगाची उधळण केल्याने गेल्या काही दिवसांपासून दाटलेली पाऊसचिंता थोड्या प्रमाणात का होईना दूर तर झालीच शिवाय गणरायाच्या स्वागताचा उत्साहसुद्धा द्विगुणित झाला.

गणेशोत्सवाच्या आगमनासाठी अवघी मुंबई सज्ज होत असताना रविवारी पावसाने शहराला झोडपून काढले. पावसाने दिवसभर उसंत घेतली नाही. मात्र, त्याचा भक्तांच्या खरेदीउत्साहावर तसूभरही परिणाम जाणवला नाही.

Maharashtra TimesFDA Ganeshotsav Rules: महाप्रसाद वाटा, स्वच्छतेचे निकष पाळा! गणेश मंडळांना ‘एफडीए’च्या मार्गदर्शक सूचनागणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच खरेदीची लगबग दिसून आली. घरातील गणरायाच्या स्वागतासाठी लागणारे पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, फुले, तोरणे, विद्युत रोषणाई, आरास करण्यासाठीच्या वस्तू यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ‘पाऊस कितीही असला तरी गणेशोत्सवाची तयारी थांबवता येत नाही. यंदा घरची आरास थोडी वेगळी करायची आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत खरेदी सुरू आहे’, असे स्वप्नील पिकुळकर यांनी सांगितले. काही ठिकाणी दुकानदारांनी साहित्य भिजू नये म्हणून दुकानांसमोर प्लास्टिकचे आच्छादन केले होते. सजावटीच्या वस्तू आणि पूजेचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठीही विशेष काळजी घेतली जात होती.

गणेशोत्सवासाठी घराची सजावट करण्यासाठी यंदा पारंपरिक वस्तूंसोबत विविध आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी खरेदी करणाऱ्यांनाही आपल्या पसंतीनुसार साहित्य निवडता येत आहे. फुलांची सजावट, आरास, तोरणे आणि रोषणाईच्या वस्तूंना ग्राहकांची पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Maharashtra TimesMumbai Bridge Closure: मुंबईतील चार पादचारी पूल बंद; गणेशोत्सव पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेचा निर्णय“पावसामुळे खरेदीवर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र, सकाळपासून ग्राहक येत आहेत. विशेषतः पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी शेवटच्या क्षणी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे,” असे संदीप शिंदे या अंधेरीतील विक्रेत्याने सांगितले.

पावसामुळे मिरवणूक किंवा विसर्जन धोकादायक ठरण्याची शक्यता असल्यास परंपरा आणि वेळेचा आग्रह न धरता पोलिस आणि प्रशासनाशी समन्वय साधून निर्णय घ्यावा. मोठ्या मंडळांनी आपत्कालीन पथक तयार ठेवून संपर्कासाठी जबाबदार व्यक्ती नियुक्त करावी. –अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा