विलियम शेक्सपियरचं एक मैकबेथ नावाचं प्रसिद्ध नाटक आहे. या नाटकात मैकबेथ नावाचा सेनापती हा त्याच्या घरी आलेल्या राजाचा जीव घेतो आणि राजाच्या गादीवर बसतो. पुढे तो आपल्या जवळच्या मित्रांचा जीव घेतो. ही घटना सांगण्यामागचं कारण म्हणजे नागपुरात तीन मित्रांनी आपल्या चौथ्या मित्राचा विश्वासघात करत त्याला संपवलं आहे. त्याला संपवण्यासाठी त्यांनी आधी त्याच्यासोबत आनंदाने दारुची पार्टी केली. ते बारमध्ये गेले. त्यानंतर बारमधून बाहेर पडत त्याच्यासोबत वाद घालत हाणामारी केली आणि त्याला निर्घृणपणे संपवलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूरच्या इतवारी परिसरात रेती व्यावसायिकाची दगड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी मित्रांनीच या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी रात्री दारू पार्टी केल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मनीष ऊर्फ मन्या चंद्रशेखर मोहिते असे मृतकाचे नाव आहे.
रविवारी सकाळी इतवारीतील धारस्कर रोडवरील कसार भवनसमोर असलेल्या एका चहाच्या टपरीत लोखंडी टेबलवर रक्ताच्या थारोळ्यात मनीषचा मृतदेह आढळून आला. चहाच्या टपरीचे मालक अमित पौनीकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाला सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मनीष हा तुमसर परिसरात रेतीचा व्यवसाय करत होता. शनिवारी रात्री मनीष त्याचे मित्र निखिल चव्हाण, कुणाल झाडे आणि विनय ऊर्फ डालू पौनीकर यांच्यासोबत बारमध्ये बसला होता. त्यानंतर मनीषने त्याचा भाऊ रोशन ऊर्फ गोलू मोहिते याला झेंडा चौकातील व्हाइट हाउस बारमध्ये बोलावले. बारमध्ये एकत्रितपणे दारू पिल्यानंतर सर्वजण दुचाकीवरून बाहेर पडले.
दारू पार्टी संपल्यानंतर मनीष आणि तीनही आरोपी गांधीबाग परिसरात गेले. तिथे जुन्या वादाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. काही वेळाने हे सर्वजण इतवारी परिसरात पोहोचले. इथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याचदरम्यान आरोपींनी मनीषवर दगड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. हल्ला इतका भीषण होता की, मनीषचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांनी आरोपींना कसं शोधलं?
रविवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. हत्येचा छडा लावण्यासाठी नागपूर पोलिसांनी विविध पथकांना तपासात सहभागी केले. त्यानंतर सायबर सेलने तांत्रिक तपास सुरू केला. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सिंबा, नेटग्रिड, एआय तंत्रज्ञान तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला.
विविध तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून मनीषसोबत असलेल्या संशयितांच्या हालचाली तपासण्यात आल्या. या तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींची घेराबंदी केली. त्यानंतर कुणाल झाडे, विनय ऊर्फ डालू पौनीकर आणि निखिल चव्हाण या तिघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान जुन्या वादातून मनीषची हत्या करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, या हत्येमागील नेमका जुना वाद काय होता? याचा तपास अद्याप सुरू आहे.
हत्या करण्याचा कट नेमका कधी आणि कुठे रचण्यात आला? हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली धारदार शस्त्रे आणि इतर साहित्य कुठून आणण्यात आले? याचा तपास तहसील पोलिसांकडून केला जात आहे. तसेच या हत्येमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा