आमदार आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मराठवाड्यातून तब्बल 211 कंपन्या या एक तर बंद पडल्या किंवा बाहेर गेल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : “राजकारणापलीकडे जाऊन आता विकासाचा विचार करण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही जी कामे सुरू केली होती, त्याचे क्रेडिट हवे तर भाजपला घेऊ द्या; पण मराठवाड्याची अडकलेली विकासकामे पूर्ण करा”, असा रोखठोक सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत त्यांनी मराठवाड्यातील उद्योग, बेरोजगारी, जीडीपी आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
मराठवाड्यातील औद्योगिक स्थितीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेल्या काही काळात मराठवाड्यातून तब्बल 211 कंपन्या एकतर बंद पडल्या आहेत किंवा राज्याबाहेर गेल्या आहेत.” मोठी निवडणूक नसतानाही सरकारचे लक्ष विकासाकडे नसून केवळ राजकारणाकडे आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवत ते म्हणाले की, “एकीकडे वार रूममध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आपापसात वाद सुरू आहेत, तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावर दरोडे पडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील जनतेला सुरक्षेची हमी कोण देणार?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Tukaram Mundhe : मला माहिती मी देव नाही, कोर्टाच्या आदेशांनुसार सुधारणा करु, तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
आदित्य ठाकरे मराठा आरक्षणावर काय म्हणाले?
मराठा आरक्षण आणि सामाजिक असंतोषाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “कोणाच्याही हक्काचे न काढता, ज्यांच्या अधिकाराचे आहे त्यांना आरक्षण दिलेच पाहिजे.” आज राज्यातील सगळे समाज रस्त्यावर उतरले आहेत, कारण सरकारकडून केवळ खोट्या आश्वासनांची खैरात केली जात आहे. सरकार म्हणून कोणीही पुढे येऊन ठोस भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे, असे ते म्हणाले.
Pune News : याला अजून मारायला हवं होतं, जो गणेशोत्सवावर बोलेल त्याला मारणारच; बापटांवर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा उन्मादपणा
जीडीपीच्या मुद्द्यावर टीका
देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना त्यांनी जीडीपीच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जीडीपी 7.8 टक्के सांगतायत, पण तो प्रत्यक्ष दिसलाही पाहिजे. एकीकडे जीडीपी वाढीचा दावा केला जातो आणि दुसरीकडे पंतप्रधान सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका असे सांगत आहेत, यात मोठी विसंगती आहे. महाराष्ट्राच्या उद्योगांच्या स्थितीवर सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अन्यथा ती केवळ कोऱ्या कागदावरच येईल,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
Pune News : वडिलांवर हात उचलणारा ते बापटांना मारहाण करणारा; पुण्यात थरार घडवणाऱ्या संतोष चव्हाणची धक्कादायक पार्श्वभूमी
आदित्य ठाकरे आणखी काय म्हणाले?
तरुणांच्या ताकदीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर देशातील Gen-Z तरुणाईमध्ये मोठी ताकद निर्माण झाली असून सर्व तरुण रस्त्यावर उतरत आहेत. “आमचे सरकार असताना आम्ही पूर्ण निधी दिला. मी रात्रीच्या वेळीही संभाजीनगरमध्ये फिरून महापालिकेच्या कामांचा आढावा घ्यायचो. मी आज निसर्ग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोललो तर मला ‘अर्बन नक्षल’ म्हटले गेले. पण मला क्रेडिटची गरज नाही, केवळ मराठवाड्याची कामे झाली पाहिजेत,” असे शेवटी आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. हवामान बदलामुळे मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर नदीजोड प्रकल्प आणि संशोधनाची गरज असताना मंत्री मात्र भलत्याच विषयांवर चर्चा करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा