Tribal community’s:आश्रमशाळांमधील ५८४ आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी मंत्री ,अधिकाऱ्यांचा राजीनामा द्या, आश्रमशाळा वसतिगृहांमध्ये सुधारणा करा आदिवासींवरील अत्याचार थांबवा अशा मागण्यांसह हजारो आदिवासी विद्यार्थी आणि पालकांनी उलगुलान मोर्चा काढला.
विकासमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
जोपर्यंत आदिवासी विकासमंत्र्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक निर्धार करून दहा हजारांवर आंदोलकांनी आयुक्तालयासमोर ठिय्या मांडला. मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी ‘नाशिकचा जनसागर मुंबईकडे वळवू,’ असा इशाराही त्यांनी दिला.
ईदगाह मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू
राज्यातील आदिवासींच्या प्रश्नांसह आश्रमशाळांमधील विद्यार्थी मृत्यू, वसतिगृहांतील प्रश्नांसंदर्भात गेल्या पंधरा दिवसांपासून ईदगाह मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आदिवासींच्या प्रश्नांसाठी मंगळवारी राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
आक्रमक घोषणांचा गजर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंत पुरके यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानापासून सुरू झालेला हा महामोर्चा जिल्हा परिषद, शालिमार, महात्मा गांधीरोड, जिल्हाधिकारी कार्यालय, जुने सीबीएसमार्गे आदिवासी विकास भवनवर पोहोचला. हातात मागण्यांचे फलक, आक्रमक घोषणांचा गजर असलेला हा जनसागर पुढे सरकत असताना शहरातील वातावरण तापत गेले.
Thane News : कळवा रुग्णालयात जेवणात सापडले झुरळ;अन्नाचे नमुने FDA कडे रवाना ,डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या जेवणात आढळला हा प्रकार
राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग
आश्रमशाळांमधील गैरव्यवस्था, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आणि आदिवासी विकास विभागाच्या कारभाराविरोधात हजारो आदिवासी विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव रस्त्यावर उतरले होते. त्यात माजी मंत्री वसंत पुरके, सुधाकर राऊत, प्रशांत गावंडे, ललित चौधरी, तुळशीराम खोटरे, लक्ष्मी जाधव यांच्यासह राज्यभरातील आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले होते.
Pune Metro: अखेर मेट्रो पुणेकरांच्या पसंतीस उतरली;आजवरच्या उच्चांकी मासिक प्रवासी संख्येची नोंद,उत्पन्नातही भरघोस वाढ
लीना बनसोड यांनी आंदोलनस्थळी येत आंदोलकांची भेट घेतली
दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी आंदोलनस्थळी येत आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. शासनाकडे मागण्या मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आयुक्तालयासमोरील ठिय्या मागे घेण्यात आला. मात्र, ईदगाह मैदानावरील आंदोलन सुरूच होते.
