म. टा. प्रतिनिधी, मुंबई : विलेपार्ले पश्चिम येथील बाप्टिस्टा रोडवरील शांता भवन इमारतीच्या ११व्या मजल्यावरील दोन घरांना मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत अडीच वर्षांचा अबीर बटाविया आणि २३ वर्षीय अंकिता छेत्री यांचा मृत्यू झाला. धुरामुळे गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत एका अग्निशमन जवानासह आठजण जखमी झाले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. परंतु इस्त्रीचा वीजपुरवठा बंद करण्यास विसरल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बघता बघता आग पसरली
विलेपार्ले पश्चिमेतील सेंट झेवियर स्कूलजवळ तळ अधिक ११ मजली शांता भवन इमारत आहे. या इमारतीच्या ११व्या मजल्यावरील बटाविया कुटुंबाच्या फ्लॅट क्रमांक ११०१ आणि ११०२ मध्ये मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आग लागली. घरातील विद्युत जोडणी, विद्युत उपकरणे, वातानुकूलन यंत्रणा, घरातील साहित्य, सोफा, पलंग, लाकडी सजावट, स्वयंपाकघरातील साहित्य आदींनी पेट घेतल्याने काही वेळातच धुराचे लोट इमारतीत पसरले. सुमारे चार हजार चौरस फुटांच्या क्षेत्रात आग पसरली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि महापालिका यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मोहीम हाती घेतली. पहाटे एक वाजताच्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यात आली. या बचावकार्यात अग्निशमन जवान मनोज सोनवणे हेही जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. एकूण आठ जखमींपैकी सहाजणांना नानावटी मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी अबीर आणि अंकिता यांना रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले.
Ghatkopar Landslide : वाढदिवसाची पार्टी अंत्ययात्रेत बदलली, भावंडांनी गिफ्ट्स आणली, आईची औक्षणाची तयारी, क्षणभर घराबाहेर पडलेल्या मुंबईकर तरुणाचा दुःखद अंतपार्थ (३२) आणि हिरेन (६४) यांची प्रकृती स्थिर असून यशस्वी (३३) आणि अभिषेक यांनाही उपचारानंतर घरी सोडण्यात आले. कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शिवम द्विवेदी (२९) यांच्यासह अग्निशमन जवान मनोज सोनवणे यांनाही उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास अग्निशमन दल आणि पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी, मरोळ येथील रवींद्र भोसले यांनी दिली.
शेवटच्या क्षणीही अबीरचा विचार
आपल्या शेवटच्या क्षणीही अंकिता छेत्रीच्या मनात लहानग्या अबीरचाच विचार होता. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, आग पसरत असताना बटाविया कुटुंबातील घरकाम करणाऱ्या अंकिताने एका बेडरुममधून अबीरला उचलले आणि त्याला घेऊन त्या बेडरुमला जोडलेल्या बाथरूममध्ये आश्रय घेतला. बचाव पथकाला अबीर तिच्या छातीवर पडलेला आढळला; दोघेही बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना सीपीआर देण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
नानावटी रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असून त्यांना आगीमुळे भाजल्याच्या जखमा झाल्या नव्हत्या.
बिल्डर हिरेन बटाविया यांच्यासह कुटुंबातील इतर चार सदस्यांना नानावटी रुग्णालयात नेण्यात आले. रात्रभर निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. किरकोळ दुखापत झाल्यामुळे अग्निशमन दलाचा एक कर्मचारी आणि एका वॉचमनला कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते; उपचारानंतर त्यांनाही घरी सोडण्यात आले.
चिमुकल्याची बॉडी कुटुंबाच्या ताब्यात
अबीरचे आई-वडील, सिद्धार्थ आणि जयनी बटाविया आपल्या कुटुंबासह बुधवारी सकाळी चिमुकल्या अबीरचं शव ताब्यात घेण्यासाठी आले होते. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुटुंबाला पार्थिव ताब्यात घेता आले. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय मसावेकर यांनी सांगितले की, अंकिता ही मूळची पश्चिम बंगालमधील होती आणि तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. आम्ही तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवत आहोत, असे ते म्हणाले. तिचे कुटुंबीय शहरात येईपर्यंत आणि रक्ताच्या नात्यातील व्यक्तींची संमती मिळेपर्यंत तिचे शवविच्छेदन प्रलंबित राहील. तिच्या काही दूरच्या नातेवाईकांनी बॉडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा