• Fri. Aug 14th, 2026

    Ghatkopar Landslide Viket Yadav dies on Birthday : ‘लेकाचे औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची होती; पण आदल्या दिवशीच तो आम्हाला सोडून गेला’ असे सांगताना विकेतची आई छाया ओक्साबोक्शी रडायला लागली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘पावसाळा सुरू झाला की, आमच्या पोटात गोळा येतो. गौशिया चाळीतील अनेक रहिवासी या तीन महिन्यांत पाठीवर संसार घेऊन दुसरीकडे राहायला जातात. कधीतरी अशी दुर्घटना घडेल, ही भीती सतत जीव जाळत राहते. यंदा ती खरी ठरली. आमच्या डोळ्यांसमोर माणसं गाडली गेली आणि आम्ही हतबलपणे पाहत राहिलो…’, राजावाडी रुग्णालयाच्या शवविच्छेदन केंद्राबाहेर मृतांच्या नातलगांचा आक्रोश अंगावर काटा आणणारा होता.

    बुधवारी पहाटे दरड कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांच्या शब्दाशब्दांत जगण्याची असहायता व्यक्त होत होती. एकाच कुटुंबातील चौघांवर काळाने घाला घातला. त्या कुटुंबातील दोन चिमुकल्यांचे मृतदेह ताब्यात घेताना नातलगांच्या अश्रूंचा बांध फुटला.

    वाढदिवशीच मरणाने जवळ केलं

    या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या विकेत यादव (२७) याचा आज, गुरुवारी वाढदिवस होता. आयुष्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या विकेतने वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच जगाचा निरोप घेतला. ‘त्याचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची होती; पण आदल्या दिवशी तो आम्हाला सोडून गेला’, असे सांगताना विकेतची आई छाया ओक्साबोक्शी रडू लागली. ‘लेकाला आता कुठे शोधू?’, हा तिचा अस्वस्थ करणारा प्रश्न ऐकून राजावाडी रुग्णालयाच्या आवारातील प्रत्येकाचे डोळे पाणावले.

    Maharashtra TimesTalasari Crime : मित्रासोबत घरी जाताना बाईक बिघडली, वाटेत सहा जणांनी बंगल्यात ओढून नेलं, 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, पालघर हादरलं“त्याच्या भावांनी त्याच्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. मंगळवारी रात्री उशिरा तो मित्रांसोबत आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी एका खोलीत गेला होता. आत इंटरनेट मिळत नसल्याने तो थोडा वेळ बाहेर आला आणि नेमक्या त्याच वेळी दरडीचा मोठा भाग त्याच्या अंगावर कोसळला.” असं आईने सांगितलं. त्याचे धाकटे भाऊ, रोहित (२४) आणि योगेश (२१), राजावाडी रुग्णालयात त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते.

    “आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले होते. पण आता आम्ही अशा एका प्रसंगासाठी एकत्र आलो आहोत, ज्याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती,” असे रोहित म्हणाला. त्याचा चुलतभाऊ शुभम बनसोडे याने सांगितले की, विकेत आपल्या आईला आधार देण्यासाठी मिळेल ती छोटी-मोठी कामे करायचा.

    ‘मी अडकलो आहे… मला वाचवा’

    विकेतसोबत असलेल्या सद्दामने घरावर दरड कोसळल्याचे कळताच घाबरलेल्या अवस्थेत घरी फोन केला. ‘मी अडकलो आहे… मला वाचवा’, अशी विनवणी त्याने केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत विकेत आणि सद्दाम दोघेही ढिगाऱ्याखाली दबले गेले. सद्दामचा हा फोन अखेरचा ठरला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.

    Maharashtra TimesKiran Indulkar : 50 ग्रॅम पावडरच्या धमकीनंतर पोलीस दलाला पुन्हा काळिमा; सापळा रचला अन् पोलीसच रंगेहाथ सापडला, कॉन्स्टेबल इंदुलकरला अटक

    भाच्यांना वाचवले; पण मुलगा गेला…

    गौशिया चाळीच्या परिसरात मूळचे अयोध्येचे कमल हसन अन्सारी आणि त्यांच्या बहिणीचे घर जवळजवळ आहे. बुधवारी पहाटे कमल यांच्या बहिणीच्या घरावर दरड कोसळली. त्यावेळी कमल यांचा १६ वर्षांचा मुलगा मोहम्मद आपल्या आत्याच्या झोपायला गेला होता. दरड कोसळल्यानंतर कमल यांनी बहिणीच्या घराकडे धाव घेतली. ढिगाऱ्याखालून त्यांनी दोन भाच्यांना बाहेर काढले; मात्र मोहम्मदचा जीव वाचवण्यात अपयश आले.

    आत्याच्या घरी भाच्याचा मृत्यू

    कुटुंबाला हातभार लागावा म्हणून छोटा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने दिल्लीहून मुंबईत आलेल्या १९ वर्षीय साहिल काझी याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. तो आत्याकडे राहायला आला होता. रात्री तो आत्याच्या दुसऱ्या घरी झोपण्यासाठी गेला होता. पत्र्याच्या खोलीवर काहीतरी कोसळल्याचा आवाज येताच त्याच्या आत्याने बाहेर धाव घेतली. त्याचवेळी भाचा ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याचे पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

    Maharashtra TimesBaramati Crime : लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध, बारामतीत तरुणीचा गूढ मृत्यू, मैत्रिणीच्या हवाल्याने आईचा मोठा आरोपपावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असल्याने येथील अनेक रहिवासी तीन महिन्यांसाठी इतरत्र राहायला जातात. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेकांचे पोट हातावर होते. काही जण दोन ते तीन हजार रुपये भाडे देऊन राहत होते, तर काहींनी काळजीपोटी दुसरीकडेही छोटी खोली घेतली होती.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा