• Sat. Jul 25th, 2026

    Mumbai News: समुद्राचे मुंबईकरांना ‘रिटर्न गिफ्ट’; किनाऱ्यांवर प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेषांचा खच

    Mumbai News: समुद्राचे मुंबईकरांना ‘रिटर्न गिफ्ट’; किनाऱ्यांवर प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेषांचा खच

    Mumbai News: मुंबई महापालिकेने राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत तब्बल २४९८.६६ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे.

    BMC(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : नाले, नद्या आणि समुद्रात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा मोठा फटका मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांना बसत आहे. भरती-ओहोटीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणावर कचरा किनाऱ्यावर येत असून, मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने राबवलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत अवघ्या ११ दिवसांत तब्बल २,४९८.६६ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.

    महापालिकेने ९ जुलै ते १९ जुलै २०२६ या कालावधीत मुंबईतील प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर ही मोहीम राबवली. या काळात प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती तसेच इतर प्रकारचा घनकचरा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. संकलित कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

    Maharashtra TimesBMC FDA Action: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन सील, काय कारण?
    जुहू समुद्रकिनाऱ्यावरून सर्वाधिक १,८२५ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. त्यानंतर वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरून २७७.६० मेट्रिक टन, दादर-माहीम किनाऱ्यावरून १५२.१० मेट्रिक टन, चिंबई-वारिंगपाडा किनाऱ्यावरून १२७.२० मेट्रिक टन, मढ-मार्वे किनाऱ्यावरून ४४.२८ मेट्रिक टन, गोराई किनाऱ्यावरून ३८.८२ मेट्रिक टन, तर गिरगाव चौपाटीवरून ३३.६६ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.

    मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ , सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महापालिका नियोजनबद्ध पद्धतीने काम करत असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली. विशेषतः मान्सून काळात भरती – ओहोटीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणावर कचरा किनाऱ्यावर वाहून येतो. तो तातडीने हटवण्यासाठी विशेष स्वच्छता पथके नियुक्त करण्यात आली असून , ही पथके नियमितपणे किनाऱ्यांची पाहणी करून कचरा संकलन आणि विल्हेवाटीचे काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

    समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कचरा नाले, नद्या किंवा समुद्रात न टाकता योग्य ठिकाणीच टाकावा, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.
    Maharashtra TimesSachin Ahir : नेत्याच्याच घरी डल्ला, सचिन अहिरांच्या घरात चोरी, 2 कोटी 65 लाखांचा ऐवज लंपास, हिऱ्यांचे दागिने अन् सोन्याचे बिस्किटे गायब
    समुद्रकिनारा—–लांबी—-संकलित कचरा
    गिरगाव चौपाटी—-१.१ किमी—-३३.६६ मेट्रिक टन
    दादर-माहीम—–५ किमी—-१५२.१० मेट्रिक टन
    चिंबई-वारिंगपाडा—–३.५ किमी—-१२७.२० मेट्रिक टन
    मढ-मार्वे—– ८ किमी—-४४.२८ मेट्रिक टन
    जुहू —–६ किमी—-१,८२५ मेट्रिक टन
    वर्सोवा—–४.५ किमी—-२७७.६० मेट्रिक टन
    गोराई—–सुमारे ७ किमी—-३८.८२ मेट्रिक टन
    एकूण—- २,४९८.६६ मेट्रिक टन

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा