मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी महाराष्ट्रातच ठेवणार, मला महाराष्ट्रातच राहायचंय असं फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. सध्या त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरंतर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. मात्र अमृता फडणवीस यांच्या विधानामुळे नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय.