दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची धग महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे. नीट पेपरफुटी आणि कथित गैरव्यवहार प्रकरणांमुळे पेटलेल्या आंदोलनाचे पडसाद नागपुरातही उमटले आहेत. संविधान चौकात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली.