Maharashtra Latest News: ‘ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे मुंबईत पडझडीच्या घटना घडल्या. चार दिवसांच्या मुसळधार पावसात महापालिका कमी पडली, काही त्रुटी समोर आल्या’, अशी कबुली अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांनी शुक्रवारी दिली. परंतु, यातून धडा घेत भविष्यात महापालिका सज्ज राहील, अशी ग्वाही देतानाच शर्मा यांनी झाडांबाबत तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, मोशी येथील कचऱ्याच्या डोंगर तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (आठ जुलै) मोशी कचरा डेपो येथे ही दुर्घटना घडल्यानंतर गुरुवारी (नऊ जुलै) पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी (११ जुलै) सात मृतदेह बाहेर काढण्यात आले.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे अपडेट्स पाहा एका क्लिकवर
