• Sun. Jul 12th, 2026
    Maharashtra ATS Raid: पाकिस्तानी टोळीशी संपर्क; विदर्भातील 10 युवक एटीएसच्या ताब्यात, पाच जिल्ह्यांत मोठी कारवाई

    Maharashtra ATS Raid: या युवकांचे मोबाइल आणि सोशल मीडिया खात्यांची बारकाईने तपासणी केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

    एटीएस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: पाकिस्तानातील कुख्यात गुन्हेगारी टोळीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क ठेवल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी राज्यभरात मोठी कारवाई केली. या कारवाईत विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला आणि वर्धा या पाच जिल्ह्यांतील दहा युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

    एटीएसच्या पथकांनी शुक्रवारी सकाळपासून विविध ठिकाणी समांतर धाडसत्र राबविले. प्राथमिक चौकशीत काही युवकांचा पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी, आबिद जाट आणि राणा हनेने या नावांशी संबंधित सोशल मीडिया खात्यांशी संपर्क झाल्याचे उघडकीस आले. मात्र, या युवकांचा नेमका सहभाग काय आहे? ते केवळ ऑनलाइन संपर्कात होते की त्यापुढे काही व्यवहार झाले, याची तपासणी केली जात आहे.

    Maharashtra TimesTukaram Mundhe : किचनमध्ये मृत उंदीर, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, नागपुरातील ‘श्री हिरा स्वीट’चा थेट परवाना निलंबित
    एटीएसने मात्र, या छाप्यांबाबत अधिकृत माहिती देणे टाळले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अनोळखी खात्यांद्वारे युवकांशी मैत्री करून त्यांना विविध लिंक पाठवल्या जात होत्या. त्यानंतर सातत्याने संवाद साधून त्यांची आर्थिक स्थिती, वैयक्तिक पार्श्वभूमी आणि मानसिकतेची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात होता. अशा पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीचे, आर्थिक अडचणीत असलेले किंवा सहज प्रभावाखाली येऊ शकणारे युवक हेरले जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

    गुप्तचर यंत्रणा सतर्क
    चौकशीदरम्यान जप्त करण्यात आलेले मोबाइल फोन, सोशल मीडिया खाती, चॅट हिस्ट्री तसेच डिजिटल व्यवहारांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. या तपासातून पुढे येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, सोशल मीडियाचा वापर करून देशातील युवकांपर्यंत पोहोचण्याच्या अशा प्रयत्नांमुळे केंद्रीय आणि राज्य स्तरावरील गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संशयास्पद ऑनलाइन संपर्क, परदेशी क्रमांक किंवा अज्ञात खात्यांवरून येणाऱ्या संदेशांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

    Maharashtra TimesNagpur Crime : ६५ वर्षीय महिलेवर अत्याचार करुन जीव घेतला, पोलिसांनी 182 CCTV तपासले, चिप्सच्या रिकाम्या पाकिटाने नराधम सापडला
    असा साधला जात होता संपर्क
    -इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर.
    -अनोळखी खात्यांवरून मैत्रीचे निमंत्रण व संवादाची सुरुवात.
    -विविध लिंक आणि संदेश पाठवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न.
    -आर्थिक अडचणीत असलेल्या किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या युवकांवर लक्ष.
    -डिजिटल माध्यमातून स्थानिक संपर्काचे जाळे निर्माण करण्याचा उद्देश.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा