रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरती दरड कोसळली.खवटी येथील ग्रामस्थ आजही भीतीच्या छायेत असल्याचं त्यांनी सांगितलं.रात्री एकच्या सुमारास ही घटना घडल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. दैव बलवत्तर म्हणून बचावलो असं या ग्रामस्थांनी सांगितलं.दरम्यान या डोंगरावरील काही झाडांची कत्तल झाल्यामुळे घडला अशी चर्चा आहे. मात्र नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईतून कोकणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील दरड बाजूला करण्याचे काम अद्यापही सुरू आहे