• Sun. Jun 28th, 2026
    चेतन रडायला लागला, म्हणाला तुला जमणार नाही, मीच केतनला ढकलतो, सियाचा दावा; एकमेकांवर दोषारोप सुरुच

    Pune Ketan Agarwal Death Case : सियाला केतनपासून लवकरात लवकर मुक्त करायचे, हा चेतनचा हेतू होता, जेणेकरुन ते दोघे महाबळेश्वरमध्ये एकांतात वेळ घालवू शकतील.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मिळून तिचा नियोजित नवरदेव केतन अगरवाल याची लोहगडावरुन ४०० फूट खोल दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे. मात्र आता चौकशीसाठी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले असताना ते एकमेकांवर दोषारोप करत आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अखेरीस चेतनचा संयम सुटला होता आणि त्याने सियाला म्हटले, की “तुला हे जमेल असं वाटत नाही, आता मीच त्याचे काम तमाम करतो.”

    मला पळून जायचं होतं, चेतनचा दावा

    पोलिसांच्या चौकशीत चेतनने सांगितले की, त्याला सियासोबत पळून जाऊन नव्याने आयुष्य सुरु करायचे होते. त्याच्या म्हणण्यानुसार, सियाचाच असा आग्रह होता की यातून सुटकेचा दुसरा कोणताही मार्ग नाही; कारण तिचे श्रीमंत कुटुंब त्यांना कुठूनही शोधून काढू शकले असते. केतनचा खून करणे हाच एकमेव उपाय असल्याचे तिने म्हटल्याचे चेतनने सांगितले.

    चेतन रडला, स्वतःकडे जबाबदारी घेतली, सियाचा आरोप

    दुसरीकडे, सियाने पूर्णपणे वेगळीच कहाणी सांगितली आहे. खुनाचा कट सुरुवातीपासूनच चेतनचा होता. तिच्या म्हणण्यानुसार, १४ जून रोजी झालेला पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला तेव्हा चेतनच हताश होऊन रडू लागला होता. लोहगडावर झालेल्या दोन ट्रेकमध्ये काहीही झालं नाही. कारण केतनला ढकलण्याचे धाडस सियाला झाले नाही. दुसऱ्यांदा अपयश आल्यानंतर चेतनचा संयम सुटला. त्याने सियाला स्पष्टपणे सांगितले की “तुला हे जमणार नाही, आता मी हे काम पूर्ण करतो.”
    Maharashtra TimesSiya Goyal : सोनम जामिनावर सुटली म्हणून सियाची हिंमत वाढली, राजा रघुवंशीच्या आईची पहिली प्रतिक्रिया, पुण्याचा उल्लेख करत म्हणाली…

    महाबळेश्वरला एकांतात वेळ घालवायचा होता

    सूत्रांच्या माहितीनुसार, चेतननेच तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. पोलिसांचा असाही आरोप आहे की, ही कृती घाईघाईने करण्यामागे त्याचा एक विशिष्ट उद्देश होता, त्याला सियाला यातून मुक्त करायचे होते, जेणेकरुन ते दोघे महाबळेश्वरमध्ये एकांत घालवू शकतील. खुनानंतरही त्या दोघांचा एकमेकांशी सतत संपर्क होता. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून, तपास अधिकाऱ्यांच्या मते, यापैकी दोन्ही आरोपींनी आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप व्यक्त केलेला नाही.

    आधी शिवीगाळ, मग पत्रकारांना धमकी; एकनाथ शिंदेंच्या सुचनेनंतर संजय दिना पाटील नरमले

    ‘मी वाकले की तू केतनला ढकल’

    चौकशीदरम्यान सियाने कबूल केले आहे की, हत्येच्या क्षणासाठी आधीच एक विशिष्ट संकेत ठरवण्यात आला होता. जेव्हा ती किल्ल्याच्या कडेला वाकली, तेव्हा ती चेतनसाठी खूण होती; त्यानंतर त्याने केतनला ४०० फूट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. या सिग्नलबाबत बऱ्याच आधीच चर्चा होऊन तो निश्चित करण्यात आला होता.
    Maharashtra TimesMira Road News : पार्क गाडीतील एअरबॅग अचानक उघडली, 25 वर्षीय तरुणाच्या मानेवर आघात, गाडीतच मृत्यूने गाठलं

    238 तास बोलणं, तेव्हाच कट रचल्याचा संशय

    पोलिसांनी मिळवलेल्या कॉल रेकॉर्ड्सवरुन असे दिसून येते की, केतनच्या मृत्यूपूर्वीच्या सहा महिन्यांच्या काळात सिया आणि चेतन यांच्यात सतत संपर्क होता. त्यांच्यात २००० हून अधिक वेळा फोनवर बोलणे झाले असून त्याचा एकूण कालावधी सुमारे २३८ तास इतका आहे. हा वेळ म्हणजे जवळपास दहा पूर्ण दिवस चाललेला संवाद. तपास अधिकाऱ्यांच्या मते, यातील बराचसा वेळ कट रचण्याच्या नियोजनासाठी खर्ची पडला होता; मात्र आता हेच कॉल रेकॉर्ड्स वापरुन, कटाची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न दोन्ही आरोपी करत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा