• Tue. Jun 30th, 2026
    बोरिवली-पनवेल-मंगळूर… रोशनचा प्लॅन; लोकलमधील घटनेनंतर फरार; शर्टवरील एका ‘लोगो’मुळे पोलिसांच्या ताब्यात

    Mumbai Local Crime: मंगळवारी मुंबई लोकलमध्ये 22 वर्षीय मयंक लोहारची हत्या करून आरोपी रोशन सुवर्ण फरार होता. पण तब्बल 15 तासांमध्ये पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मयंक लोहारची हत्या झाल्याच्या तब्बल 15 तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडला असून त्याला अटक केली आहे. रोशन सुवर्ण (वय 30 वर्षे) याला पोलिसांनी पनवेलमधून 22 वर्षीय मयंक लोहारची चाकू भोसकून हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. मंगळवारी रात्री पावसामुळे लोकल ट्रेनचा दरवाजा बंज करण्यावरून झालेल्या वादादरम्यान रोशनने मयंकला ठार मारलं.

    कोण आहे रोशन सुवर्ण?

    रोशन सुवर्ण मिरा भाईंदरयेथील रहिवासी असून त्याच्या कुंटुंबियांसोबत राहतो. अंधेरी विमानतळाजवळ कार्गो हँडलिंगची सुविधा देणाऱ्या कंपनीमध्ये बार कोड बनवण्याचं काम करत होता. तो त्याच्या वडील आणि भावासोबत या कंपनीमध्ये काम करत होता. लोकलमधून बोरिवलीमध्ये उतरून तो मिरा रोडला गेला आणि तिथून पनवेलपर्यंत पोहोचला. पनवेलमधून पोलिसांनी फरार रोशनला अटक केली.

    Maharashtra TimesMayank Lohar : आमचा आधार हरपला, मयंकच्या आईचा टाहो; डब्यातले 30 प्रवासी काय करत होते? धाकट्या बहिणीचा उद्विग्न सवाल

    रोशनच्या चौकशीदरम्यान तो घडाघडा बोलू लागला आणि गुन्ह्याची कबुली दिली. मंगळवारी सायंकाळी काम संपवून त्याने एक अख्खी रमची बाटली संपवली होती. त्यानंतर तो घरी जायला निघाला. अंधेरी पूर्वेतून तो कॅबने घरी जाण्याचा विचार करत होता. पण त्या दिवशी मुंबईमध्ये पाऊस सुरू होता. कोंडीमध्ये अडकून राहील त्यामुळे त्याने लोकलने जाण्याचं ठरवलं. अंधेरी रेल्वे स्थानकात तो चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये प्रथम श्रेणीत चढला. त्यानंतर अंधेरी ते बोरिवली रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून मयंक आणि रोशनमध्ये वाद झाला. तेव्हाच रोशनने चाकू मयंकच्या पोटात भोसकून त्याची हत्या केली आणि बोरिवली स्थानकात उतरून पळ काढली.

    रोशनला कसं घेतलं ताब्यात?

    प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर थोडीफार गर्दी असल्यामुळे त्याने तिथून पळ काढली. आरोपीची ओळख सुरुवातील पटली नसल्यामुळे शोधमोहीम हाती घेतली. पश्चिम रेल्वेवर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. चर्चगेट ते नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान तब्बल 400 कॅमेरांमधील फुटेज पोलिसांनी पाहिली. लोकलमधून व्हिडीओमुळे त्याचा चेहरा ओळखणं शक्य झालं होतं. त्यानुसार एका सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये तो रेल्वे स्थानकावर दिसून आला. त्या व्हिडीओमध्ये त्याने घातलेल्या शर्टावर त्याच्या कंपनीचा लोगो होता. या लोगोच्या आधारे रोशनची ओळख पट‍वण्यात पोलिसांना यश मिळाले.

    त्यानंतर अधिकाऱ्यांनी कार्गो कपंनीला भेट देऊन त्याची माहिती काढली. मोबाईन नंबर, पत्ता आमि इतर माहितीच्या आधारे त्याचं लोकेशन ट्रॅक केलं. मयंकची हत्या करताच तो सर्वप्रथम रिक्षाने मिरा रोडला आपल्या घरी गेला. आंघोळ करून काही कपडे पॅक केले आणि शहर सोडून पळून जाण्याच्या तयारीला लागला. कुटुंबियांना “मी लवकरच; परत येईन” असं सांगून त्याने पनवेलला जाण्यासाठी कॅब बुक केली. तिथून मंगळुरला जाण्यासाठी त्याने बसचं तिकीट बुक केलं होतं. ही बस दुपारी 3 वाजता सुटणार होती. पण तेवढ्यात पोलिसांना तो कुठे आहे हे समजलं होतं.

    Maharashtra TimesMumbai Local Crime: ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, २२ वर्षीय मयांकसाठी प्रवास ठरला शेवटचा; रात्री ११ वाजता फास्ट लोकलमध्ये काय घडलं?

    पनवेल रेल्वे स्थानकात रोशन

    दुपारी 2 वाजत पोलिसांचं एक पथक पनवेलमध्ये दाखल झालं. तेव्हा रोशन रेल्वे स्थानकात बसलेला त्यांना दिसला. त्याला तिथेच ताब्यात घेऊन बोरिवली जीआरपीमधून आणून अटक केली अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक एम. खुपेकर यांनी दिली आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर मयंकची जिवंत आहे कि नाही हा प्रश्न रोशनने विचारला अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत असं सांगितल्यावर त्याने सोशल मीडियावरील बातम्या दाखवल्या. ती वृत्त खोटी असल्याचं सांगत पोलिसांनी त्याला पोलिस स्थानकात नेलं आणि मग खरं कारण सांगत अटक केली.

    यापूर्वी रोशनच्या नावानो कोणताही गुन्हा नोंदलेला नाही आहे. हल्ल्यात वापरलेला चाकूही रोशनने त्याच्या मित्राकडून काही दिवसांपूर्वीच खरेदी केला होता. तेव्हापासून तो चाकू रोशनच्या बॅगेतच होता. मंगळवारी पहिल्यांदाच त्याने तो चाकू बाहेर काढला. सध्या पोलिस त्या मित्राची चौकशी करून रोशनला चाकू देण्यामागचं कारण शोधत आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा