• Thu. Jun 25th, 2026

    Uniform Civil Code : महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणार का? एकनाथ शिंदे यांचं सूचक वक्तव्य

    Uniform Civil Code : महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणार का? एकनाथ शिंदे यांचं सूचक वक्तव्य

    समान नागरी कायद्याबाबत महाराष्ट्रात पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : देशात गुजरात, उत्तराखंड आणि आसाम या राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे. यानंतर आता महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्याबाबतच्या घडामोडी घडू शकतात का? असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी आपण समान नागरी कायद्याबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली घडू शकतात, असे संकेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या वक्तव्यातून अप्रत्यक्षपणे दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर आता विरोधकांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणााले?

    “यूनिफॉर्म सिविल कोडवर शिवसेनेची भूमिका ही आधीपासून सकारात्मक राहिलेली आहे. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आधीपासून देशामध्ये समान नागरी कायदा असला पाहिजे अशी आहे. त्यामुळे तीच भूमिका आमचीदेखील आहे. त्यामुळे सगळ्यांना समान न्याय पाहिजे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    “कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. या सगळ्या गोष्टींमुळे आमची भूमिका सकारात्मक आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती तीच आमची सुद्धा आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेत आहोत. त्यामुळे या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत”, अशी महत्त्वाची भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे.

    ‘गोकुळ गीते यांच्याबद्दल नरेंद्र दराडेंना कल्पना दिली’

    “नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ते शिवसेना पक्षात थेट कायद्याने प्रवेश करु शकत नाहीत. म्हणून त्यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या संपर्कात होते. आम्ही पराभवी झालेले शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. दराडे देखील म्हणाले की, संघटना आणि पक्षाची ताकद वाढत असेल तर यामध्ये अशाप्रकारचे जे निर्णय घ्यावे लागतील”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगरवर भाष्य

    “आमची आता मोठी टीम तयार झाली आहे. राज्यसभेमध्ये दोन खासदार आहेत, अशा 15 खासदारांची टीम तयार झालेली आहे. त्यामुळे शिवसेना अधिक बळकट होईल. एनडीएची ताकद वाढलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा संकल्प केलेला आहे”, असं शिंदे म्हणाले.

    “मी कालही सांगितलं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गेल्या 10 वर्षात 12 लाख कोटींचा निधी महाराष्ट्राला मिळाला आहे. सहकारी मंत्री अमित शाह यांनी राज्यातील साखर कारखानदार, शेतकरी यांना मदतीचा निर्णय घेतला, नक्षलवाद संपवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचं योगदान या देशाच्या विकासात मोठ्या प्रमाणात आहे, पंतप्रधान मोदी या महाराष्ट्राला पैसे देताना कधी हात आखडता घेत नाही. त्यामुळे डबल इंजिनच्या सरकारमध्ये 6 खासदार आले आहेत. त्यांचं मी स्वागत केलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा