राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करीत काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. सध्या (१६ जून) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा १०.३५ टक्के आहे.
Operation Tiger UBT Spilt : लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गटस्थापनेला सकारात्मक संकेत, ठाकरेंचे 6 खासदार शिवसेनेत दाखल होणार!
सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बांधकाम सुरू असलेली सुमारे तीन हजारांहून अधिक ठिकाणे आहेत. जलतरण तलावांच्या जोडण्याही खंडित करण्यात आल्या. तसेच, नवीन बांधकामांना तूर्त तरी जलजोडण्या देण्यात येणार नाहीत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली. सर्व जलतरण तलावांना देण्यात आलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडित करण्यात येणार आहेत. जलजोडणीधारकांकडून वाढीव जलजोडणी किंवा अतिरिक्त जलजोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यास पुरेसा पाणीसाठा तयार होईपर्यंत ते प्रलंबित ठेवण्यात येणार आहेत. औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले. ‘एरीअेटेड वॉटर’ व ‘पॅकेज वॉटर बॉटलिंग’ प्लांटना दिलेल्या जलजोडण्यांतून होणारा पाणीपुरवठा तेथील कामगारांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेइतका कमी करण्यात येत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. महापालिका प्रशासनाने आधीच जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार मुंबईत १५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू केली होती.
Omraje Nimbalkar: ओमराजेंचा चकवा, श्रीकांत शिंदेंच्या नावाने बुक असलेल्या विमानाने पुण्यातून दिल्लीला रवाना; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
गैरवापर आढळल्यास कारवाई
पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी मुंबई महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच पाण्याचा गैरवापर आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे. वॉर्डस्तरावर महापालिकेकडून तसे निर्देशही देण्यात आले आहेत.
टँकर, बोअरवेल, विहिरीचा पर्याय
सार्वजनिक स्वच्छतागृह व प्रसाधनगृह सांभाळणाऱ्या संस्थांनी जास्तीत जास्त टैंकर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा आणि पिण्याच्या पाण्याची बचत करावी. पिण्याच्या पाण्याच्या वापराव्यतिरिक्त, इतर वापरासाठी विहिरी, कुपनलिका यांचा जास्तीत जास्त वापर करावा. बीपीटी, वाहन धुणे, उद्यानांमधील झाडांना पाणी घालणे, रस्ता किंवा परिसर धुण्यासाठी बोअरवेल किंवा विहिरीच्या पाण्याचा वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, आरसीएफ, एचपीसीएल, बीपीसीएल, नेव्ही, एमआयडीसी आदी आस्थापनांनी दुय्यम वापरासाठी व परिचालनासाठी कुलाबा तसेच इतर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील प्रक्रियायुक्त पाण्याचा फेरवापर करावा, असेही महापालिकेने परिपत्रकात नमूद केले आहे.
