सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने संबंधित यंत्रणांना अनेक आदेश दिले. अशा फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या तक्रार निवारण आणि रक्कम परत मिळवून देण्याबाबतच्या प्रणालींची त्वरित अंमलबजावणी आणि कार्यवाही सुनिश्चित करावी, असे आदेश न्यायालयाने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि तपास संस्थांना दिले आहेत. बनावट कागदपत्रांशी संबंधित डिजिटल अरेस्ट प्रकरणाची न्यायालयाने स्वयंप्रेरणेने दखल घेत सुनावणी घेतली.
Maharashtra Monsoon Death: धो-धो नव्हे, जीवघेणा पाऊस! गेल्या महिनाभरात अनेकांनी गमावला जीव, राज्यात पावसाचे बळी किती?
सर्व उच्च न्यायालयांच्या निबंधकांना या मानक कार्यप्रणालीची प्रत उपलब्ध करून द्यावी, असे आदेश न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला दिले. तसेच, या यंत्रणांबाबत नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी योग्य ती जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश न्यायालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. अशा प्रकरणांत अधिक उत्तरदायित्वाची अपेक्षा करत, सायबर फसवणूक निवारण यंत्रणेअंतर्गत नोंदवलेल्या आणि निकाली काढलेल्या तक्रारींचा राज्यनिहाय व बँकनिहाय तपशील असलेला अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने संबंधित प्राधिकरणांना दिले.
‘डिजिटल अरेस्ट’सारख्या फसवणुकीच्या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि फसवणूक झालेल्या पीडितांचे पैसे वसूल करण्यासाठी मदत करण्यासंबंधी उपाययोजनांबाबत बँका व वित्तीय मध्यस्थांशी चर्चा करावी, असेही खंडपीठाने केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आंतर-विभागीय समितीला उद्देशून नमूद केले. डिजिटल अरेस्ट या संकल्पनेला फौजदारी कायद्यात अधिकृतपणे परिभाषित करावे आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेला एक स्वतंत्र गुन्हा म्हणून त्याचा समावेश करण्यावर विचार करावा, अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली होती. त्यानंतर एका आठवड्याने हे निर्देश आले आहेत.
पनीरसारखे दिसणारे ‘अॅनालॉग’ हद्दपार! साठवणूक, वाहतूक, वितरणावर एक वर्षासाठी प्रतिबंध; FDAचा निर्णय
१८ राज्यांत सायबर केंद्रे, ई-झीरो गुन्हे यंत्रणा
राज्य सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि ई-झीरो एफआयआर ही यंत्रणा केवळ १८ राज्यांनी स्थापन केली आहे. याची दखल घेत उर्वरित राज्यांनी चार आठवड्यांत अशी केंद्रे अधिसूचित आणि कार्यान्वित करावीत, असे आदेश न्यायालयाने दिले.
या टप्प्यावर नोंदवलेली प्रगती कौतुकास्पद असली, तरी आधीच अस्तित्वात असलेल्या यंत्रणा अधिक अंमलबजावणी व्यापकपणे स्वीकारणे, जलद आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा होणे आवश्यक आहे.--सर्वोच्च न्यायालय
