Rohit Pawar: रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी १२ जूनपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रोहित पवार यांनी या कर्जमाफीच्या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी १२ जूनपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. पंढरपूर येथे हे आंदोलन करण्यात येणार असून कर्जमाफी, पीकविमा आणि शेतकरी खात्यांमध्ये थेट आर्थिक मदत यांसह विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या आहे.
Maratha Reservation : अखेर लढ्याला यश आलं! मनोज जरांगे इम्पॅक्ट, मराठा समाजासाठी मोठे निर्णय; वाचा संपूर्ण शासन निर्णय
आमदार रोहित पवार यांनी एक्सवर या आंदोलनाची घोषणा केली. ‘२०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेतील अटी शिथिल कराव्यात, तसेच दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा द्यावा’, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय २०१७च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सुमारे ६.५६ लाख शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा, पीकविमा योजनेतील कथित जाचक अटी रद्द करून एक रुपयातील पीकविमा योजना पुन्हा लागू करावी आणि पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांची फसवणूक, शिवसेना संपवण्याचा डाव? बाळ माने-विनायक राऊतांचं एकमेकांकडे बोट
‘काॅक्रोच’चे म्हणणे ऐकावेच लागेल
‘दिल्लीच्या जंतरमंतरवर ‘कॉक्रोच’चे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते आणि भवितव्य म्हणतो ते हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवणे योग्य नाही. हे सर्व विद्यार्थी ‘कॉक्रोच’ बनून आपला आक्रोश व्यक्त करीत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल,’ अशी भूमिका शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केली. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
