Amol Mitkari: पार्थ पवार यांना आवरणारे आता कुणीच उरले नसल्याची भावना पक्षात प्रबळ होते आहे. त्यामुळे अनेकांना भवितव्याची चिंता सतावत असल्याचे उघड बोलले जाऊ लागले आहे.
या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे इच्छुक आहेत. मात्र आता राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीतील सर्व निर्णय प्रक्रियेवर पार्थ पवार यांच्याच चौकडीचा प्रभाव असल्याचे पक्षात उघड बोलले जाऊ लागले आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल पटेल यांचे नाव परस्पर हटवले गेल्यानंतर पटेल हे पक्षात फारसे सक्रीय दिसत नाहीत. सुनील तटकरे हे प्रचंड नाराज असून नाराजांची ही यादी दिवसेंदिवस वाढतच आहे.
Maharashtra Decentralises Govt Land Powers: शासकीय जमिनींच्या व्यवहारांचे नियम बदलले; जिल्हाधिकाऱ्यांना निर्णयाचे अधिकार, महसूल विभागाचा मोठा निर्णय
या जागेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही ८ जून असून ती आपल्यालाच मिळावी यासाठी पक्षातील विविध नेत्यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. अखेर ही उमेदवारीची पक्षश्रेष्ठी कुणाच्या गळ्यात टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. २०१९मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष अर्ज भरून खासदार झालेल्या राणा २०२४मध्ये भाजपमध्ये गेल्या व त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून राजकीय पुनर्वसन व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी अलिकडेच भाजपच्या नेत्यांशीही संपर्क साधला असता रिक्त जागा ही राष्ट्रवादीच्या कोट्यातली असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार, पवार यांची भेट घेतल्याचे समजते.
बाळ माने यांच्या माघारीवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर
मिटकरी यांची थेट पोस्ट
पक्षात असलेली ही खदखद विधान परिषदेचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स समाजमाध्यमांवर बोलून दाखवली. ‘सुनेत्रा वहिनींची राज्यसभेची रिक्त जागा ही फक्त राष्ट्रवादीचीच आहे, यावर दुसऱ्या कुणी हक्क सांगून मोर्चेबांधणी करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादा नावाचे अधिष्ठान आहे. त्यामुळे सुनेत्रा वहिनी घेतील तोच निर्णय अंतिम राहील. हा पक्ष अजितदादांचा दरारा असणारा पक्ष आहे’, असे लिहित त्यांनी पक्षातील असंख्यांची अस्वस्थता उघड केली आहे.
