• Sun. Jun 7th, 2026

    महामुंबईत 14 मार्गांवर 300 किमी लांब ‘मेट्रो नेटवर्क’ उभारणार; वर्षाअखेरीस 120 किमीचा टप्पा होणार पार

    महामुंबईत 14 मार्गांवर 300 किमी लांब ‘मेट्रो नेटवर्क’ उभारणार; वर्षाअखेरीस 120 किमीचा टप्पा होणार पार

    Mumbai Metro Network: 2026 अखेरपर्यंत शहरातील मेट्रो नेटवर्क 120 किलोमीटर लांब होणार आहे. सध्या अनेक मार्गिकांचं काम सुरू असून यापूर्वीच दोन मार्ग सुरू झाले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईत मेट्रोचं जाळं 90 किलोमीटर पार पोहोचलं आहे. 2025मध्ये अॅक्वा लाइन सुरू झाल्यानंतर हे जाळं 80 किलोमीटर लांब विस्तारलं होतं. तेव्हाच दिल्ली आणि बंगळुरूनंतर मुंबई भारतातील तिसरं सर्वात लांब मेट्रो नेटवर्क असलेलं शहर बनलं. भविष्यात शहरात 9 मेट्रो मार्गिकां प्रस्तावित आहेत. यापैकी काही पूर्णपणे नवीन असून काही जुन्या मार्गांचा विस्तार करून तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण मेट्रो जाळं 300 किलोमीटरपेक्षा लांब होणार आहे. दिल्ली नंतर सर्वात लांब मेट्रो नेटवर्क असलेलं मुंबई तिसरं शहर बनेल. पण हा दिवस खूप लांब असला तरी वर्षाअखेरीस मुंबईतील मेट्रो 120 किलोमीटर लांब विस्तारणार आहे.

    कोणत्या मार्गिका कार्यरत आहेत?

    मुंबई मेट्रोच्या 14 प्रमुख मार्गिका आहेत. ब्लू लाइनवरील मुंबई मेट्रो लाइन 1 (वर्सोवा ते घाटकोपर) सर्वप्रथम 2014मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर 8 वर्षांपर्यंत एकही नवीन मेट्रो लाइन सुरू नाही झाली. यावेळी अनेक मार्गांवरील मेट्रोचे प्रस्ताव मांडण्यात आले पण पहिल्या मार्गिकेच्या भूसंपादानात आणि बांधकामात अडथळे येऊ लागले. म्हणून मेट्रो लाइन 3 अॅक्वा लाइन पूर्णपणे भूमिगत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पण या मार्गिकेच्या बांधकामात वेळ आणि खर्चही मोठ्या प्रमाणा वाढल्यामुळे विलंब झाला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापुढील सर्व मार्गिका उन्नत असतील असा निर्णय घेतला.

    मुंबई मेट्रो 3 (भुयारी मार्गिका)

    त्यानंतर मुंबई मेट्रो 2चं बांधकाम 2016मध्ये सुरू झालं. यानंतर 2022मध्ये यलो लाइनवरील मुंबई मेट्रो 2ए (दहिसर पूर्व ते डहाणूकरवाडी) ही मार्गिका सुरू झाली. त्यानंतर रेड लाइनवरील दहिसर पूर्व ते आरेपर्यंत मेट्रो लाइन 7 सुरू झाली. त्यानंतर 2023मध्ये मेट्रो 2ए अंधेरी पूर्वेपर्यंत वाढवण्यात आली आणि लाइन 7 गुंदावलीपर्यंत. पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि लिंक रोडवर या दोन्ही मार्गिका धावतात. यादरम्यान, एक नवीन पर्पल लाइन नवी मुंबईमध्ये सुरू झाली. नवी मुंबई मेट्रो लाइन 1 (बेलापूर ते पेंढार)चं काम 2023मध्ये पूर्ण झालं.

    त्यानंतर शहरातील सर्वात महत्त्वाकांक्षी मार्गिकेचा पहिला टप्पा 2024मध्ये सुरू करण्यात आला. अॅक्वा लाइनच्या पहिल्या टप्प्यात आरे जेव्हिएलआर ते बीकेसी पर्यंत सुरूवात करण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर 2025मध्ये कफ परेडपर्यंत विस्तार करून अॅक्वा लाइन पूर्णपणे कार्यरत झाली. ही शहरातील सर्वात इंटरकनेक्टेड लाइन आहे. यानंतर 2026मध्ये दोन नव्या मार्गिका सुरू झाल्या. यलो लाइनवरील लाइन 2बी (अंधेरी पश्चिम ते मंडाले) मार्गिकेचा पहिला टप्पा (मंडाले ते डायमंड गार्डनर) सुरू झाला आहे. याशिवाय रेड लाइनचा मुंबईतच्या उत्तरेकडीही विस्तार झाला आहे. मेट्रो लाइन 9 (दहिसर ते मिरा भाईंदर) कार्यरत झाली असून उत्तरेकडील उपनगरांमधील लोकलवरील ताण कमी झाला आहे. या सर्व मार्गिका सध्या शहरात सुरू असून मुंबईत मेट्रो नेटवर्क 90 किलोमीटर लांब बनलं आहे.

    मुंबई मेट्रो 9

    2026मध्ये कोणत्या मार्गिका सुरू होतील ?

    दरम्यान, ग्रीन लाइन नावाने एका नव्या मार्गिकेचं बांधकाम सुरू झाला. या मार्गावर लाइन 4 (वडाळा ते कासावडवली) 4ए (कासारवडवली ते गायमुख), मेट्रो लाइन 10 (गायमुख ते शिवाजी चौक) आणि लाइन 11 (वडाळ्यामार्गे वांद्रे कुर्ला संकुल ते गेट वे ऑफ इंडिया) या मार्गिकांचा समावेश आहे. यापैकी मेट्रो लाइन 4वरील पहिल्या टप्प्यातील बहुतांश काम पूर्ण झालं असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही सुरू होण्याची शक्यता आहे. एका नव्या पिंक लाइनवर मेट्रो लाइन 6चं (लोखंडवाला ते जोगेश्वरी) बांधकाम सुरू असून 2026मध्ये ही सुरू होण्याची शक्यता आहे.

    इतर प्रस्तावित मार्ग कोणते ?

    ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ऑरेंज लाइनचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. मेट्रो लाइन 5 आणि 12 (ठाणे-भिवंडी-कल्याण-नवी मुंबई) या मार्गांचा समावेश आहे. याशिवाय तीन नव्या मार्गिकांचे प्रस्ताव सध्या सादर करण्यात आले आहेत. पहिली गोल्ड मेट्रो लाइन 8 (मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ), दुसरी पर्पल लाइन 13 (मिरा रोड ते विरार) आणि तिसरी शहरातील सर्वात लांब पल्ल्याची मजेंटा लाइन 14 (कांजूर मार्ग ते बदलापूर) या मार्गिकांचा समावेश आहे. या सर्व मार्गिका सुरू झाल्यावर मेट्रोचं जाळं 300 किलोमीटर लांब होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा