Uddhav Thackeray Birthday: उद्धव ठाकरेंच्या मुद्द्यावरून शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांच्या मनात चलबिचल सुरू असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.
उद्धव ठाकरेंवरून शिंदेंच्या गोटात खळबळ; बंडू जाधवांनी पोस्ट डिलिट केली, पण ओमराजेंनी धाडस केलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धनाजी चव्हाण, परभणी: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना सकाळी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली होती. खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केला होता. असे असले तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केल्याने चर्चांना उधाण आलं होतं. प्रसार माध्यमांकडूनही याची दखल घेऊन बातम्या देखील प्रसारित करण्यात आल्या. या पोस्टवर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी काही तासांतच उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिलेली पोस्ट सोशल मीडियावरून हटवली आहे. मात्र त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही उद्धव ठाकरे यांना सोशल मीडिया अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेनेचे एकनिष्ठ आणि कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. सामान्य शिवसैनिकापासून ते दोन टर्म आमदार आणि तिसऱ्या टर्मचे खासदार म्हणून ते कार्यरत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पहिली फूट पडली तेव्हा राज्यभरात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार, खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. पण परभणी जिल्हा मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. परभणी जिल्हा मुळातच शिवसेना आणि ठाकरे परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच खासदार संजय जाधव व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणेच पसंत केले. पण काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सहा खासदारांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता.
खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये त्यांच्याविषयी उलट सुलट चर्चा देखील सुरू झाली. त्यानंतर खासदार संजय जाधव यांनी आपली बाजू मांडली. विकास कामांसाठी आणि जिल्ह्यातील विविध प्रश्न तडीस नेण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर 20 कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरात बॅनरबाजी देखील खासदार संजय जाधव यांच्याकडून करण्यात आली. या दरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी परभणी जिल्हा दौरा केला होता. या दौऱ्यावेळी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर कडाडून टीका केली होती. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या खासदार संजय जाधव यांच्याकडे तब्बल दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता कुठून आली? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. पण आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली.
खासदार संजय जाधव यांच्या पोस्टची परभणी जिल्ह्यासह राज्यभरामध्ये चर्चा झाली. संजय जाधव यांनी टाकलेल्या या पोस्टची दखल प्रसारमाध्यमांनी देखील घेतली. यावर प्रतिक्रिया देताना कडवट शिवसैनिक म्हणत होते की, तुम्ही दिल्या घरी सुखी राहा, उद्धव ठाकरे सोबत तुम्ही गद्दारी केली आहे आणि आता त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा का टाकत आहेत? असा सवाल विचारला जात होता. तर खासदार संजय जाधव यांचे समर्थक म्हणत होते की, “खासदार संजय जाधव हे वारकरी आहेत त्यामुळे ते सर्वांचा आदर करतात. किती जरी कडवटपणा दुसऱ्याकडे असला तरी खासदार संजय जाधव हे सर्वांसोबत चांगले वागतात,” अशा देखील पोस्ट टाकण्यात आल्या.
उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शेअर केलेल्या पोस्टने राजकीय गदारोळ तयार झाल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट डिलिट केली. ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत की काय आणि त्याच दबावातून तर जाधव यांनी पोस्ट डिलिट तर केली नाही ना, असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा