नाशिक विधान परिषद निवडणुकीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने माघार घेतल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे पदाधिकारी आणि नगसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याची चर्चा आहे. हाच असंतोष शमविण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत नाशिकमध्ये पोहोचले. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नाशिकमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय झाला असल्याचं राऊतांनी सांगितलं. तर आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू शिंदे गट आहे, निकालावेळी कळेल आम्ही कुणाला मतदान केले, असा टोला राऊतांनी लगावला.