राज्य सरकार आणि मनोज जरांगे म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हणत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी हल्लाबोल केलाय. मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणानंतर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यावरूनच नवनाथ वाघमारे आक्रमक झाले आहेत. जरांगेंनी सेटलमेंट केली असा आरोपही वाघमारेंनी केला.