• Sun. Jun 14th, 2026
    12 स्थानकं, डोंगरांमधून 7 बोगदे, देशात पहिल्यांदाच समुद्राखाली रेल्वे मार्ग; मुंबईत कधी धावणार ‘बुलेट ट्रेन’?

    Bullet Train Project: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितित भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची सप्टेंबर 2017 पायाभरणी झाली. जपान, चीन आणि फ्रान्ससारख्या देशांमध्ये अनेक वर्षांपासून हाय-स्पीड रेल्वे जाळे विस्तारले आहे. भारतानेही त्या दिशेने मोठं पाऊल टाकलं. या गोष्टीला नऊ वर्ष उलटले. आता बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामात मोठं यश मिळत असून लवकरच भारतातही हाय-स्पीड रेल्वे धावेल.

    गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे. मुंबईजवळ समुद्राखाली बोगद्यामधून बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्यात येत आहे. दोन्ही राज्यांमध्ये प्रस्तावित स्थानकांचं बांधकाम सुरू आहे. पहिल्यांदाच पूर्णपणे भारतात तयार केलेली ही हाय-स्पीड ट्रेन 2027पर्यंत प्रवाशांसाठी खुली होईल अशी अपेक्षा आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी व्हायाडक्ट तयार केले जात आहेत.

    पण हा प्रकल्पसुद्धा विलंबाच्या विळख्यात सापडला होता. भूसंपादनापासून, खर्चामध्ये होणारी वाढ ते अभियांत्रिकी संकटांपर्यंत बुलेट ट्रेनसमोर अनेक अडथळे आली. पण या सर्व अडथळ्यांना सामोरे गेल्यानंतर आता हा प्रकल्पा एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे. सरकारने वर्षानुवर्ष दाखवलेलं स्वप्न अखेर सत्यात उतरताना दिसतयं.

    बुलेट ट्रेन प्रकल्पाची सुरुवात कशी झाली?

    भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या बांधकामाची सुरूवात 2017मध्ये जरी झाली असली तरी यासाठी अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होत्या. मुंबई ते अहमदाबाद रेल्वे मार्गावर दररोज व्यावसायिक, कर्मचारी मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर हाय-स्पीड रेल्वे मार्ग उभारण्याची आवश्यकता होती. जपानच्या शिंकांसेन सिस्टिमच्या सहाय्याने देशातील पहिला बुलेट ट्रेन कॉरिडोर विकसित केला जात आहे. जगातील सर्वात सुरक्षित आणि प्रगत तंत्रज्ञांपैकी हे एक आहे.

    मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोर 508 किलोमीटर लांब असेल. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांसह दमन आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांमधून ही बुलेट ट्रेन धावणार. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या मार्गावर एकूण 12 स्थानकं असतील. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भारुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे. NHSRCLकडून या बुलेट ट्रेनचा विकास होत आहे.

    या मार्गावरील बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने प्रवास करेल. मुंबई ते अहमदाबाद सुपरफास्ट प्रवास शक्य होणार आहे. सामान्य रेल्वेने या दोन शहरांमधील प्रवासासाठी 7 तास लागतात. सध्या वंदे भारतमुळे सर्वात वेगवान प्रवास शक्य आहे. कवेळ 5.30 तासांत अंतर पार होतं. बुलेट ट्रेनमुळे हाच प्रवास 2 तासांत पूर्ण होणार आहे.

    मुंबई-अहमदाबाद मार्गाची निवड का केली?

    भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई ते अहमदाबाद मार्गावर व्यावसायिक आणि उद्योजक प्रवास करतात. देशाच्या आर्थिक राजधानीमधून अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा सारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांदरम्यान जलद कनेक्टिव्हिटी निर्माण करणं आवश्यक होतं.

    अनेक वर्षांच्या विलंबानंतर अखेर प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. 349 किलोमीटर लांब व्हायाडक्टचं काम पूर्ण झालं आहे. उन्नत मार्गावरील रुळांसाठी 443 किलोमीटर लांब मार्गांवर खांब उभारण्यात आले आहे. 90 टक्के मार्गिका उन्नत असेल. शिवाय 374 किलोमीटर लांब मार्गावर रेल्वे रुळ पडले आहेत. गुजरातमध्ये 350 किलोमीटर मार्गावर काम पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रात 74 किलोमीटर लांब मार्गावर पायाभरणी झाली आहे.

    बुलेट ट्रेन बोगदा

    किती काम पूर्ण?

    12 स्थानकांपैकी 8 स्थानकांवरील पायाभरणीचं काम पूर्ण झालं आहे. यामध्ये गुजरातमधील वापी, बिलिमोरा, सुरत, भारुच, आनंद, बडोदा, अहमदाबाद आणि साबरमती स्थानकांचा समावेश आहे. मुंबईमध्ये वांद्रे कुर्ला संकुल (BKC) येथे भूमिगत स्थानक उभारलं जात आहे. त्यासाठी खोदकाम पूर्ण होतं आहे. पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या बोगद्यासाठी 1.5 किलोमीचर लांब खोदकाम पूर्ण झालं आहे. विरार आणि बोईसर स्थानकांना या बोगद्याद्वारे जोडणार आहे. या मार्गावर तब्बल 7 डोंगराळ बोगदे आहे.

    ठाणे ते मुंबई स्थानकांदरम्यान बोगद्याचं काम आव्हानात्मक आहे. ठाण्याच्या खाडीखालून देशातील पहिला पाण्याखालील रेल्वे बोगदा तयार करण्यात येत आहे. हा मार्ग 7 किलोमीटर लांब असेल. तसेच, घणसोली ते शिळफाटा मार्गावरील 4.8 किमी बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. याशिवाय तब्बल 17 नद्यांवरील पूलही उभारण्यात आले आहे.

    बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा ऑगस्ट 2027मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. सुरत आणि बिलिमोरा मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. त्यानंतर वापी ते सुरत मार्ग, मग वापी ते अहमदाबाद, ठाणे ते अहमदाबाद आणि शेवटी मुंबई ते अहमदाबाद हा पूर्ण मार्ग सुरू होईल. यासाठी डिसेंबर 2029ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed