पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री व आमदार उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली होती. कार्यक्रमांचे आणि खर्चाचे ऑडिट करावे, अशी मागणी रोहित पवारांनी केलेली. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. यासोबतच मराठा नेते मनोज जरांगे यांना दिलेल्या आश्वासनाबाबत देखील फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.