• Sun. Jun 14th, 2026

    Nashik News : वारी चुकायाची नाही! ‘सर्जा-भास्कर’ ओढणार संत निवृत्तीनाथांचा रथ, नाशिकमधील ‘या’ बैलजोडीला मिळाला मान; मालकाचे डोळे पाण्याने डबडबले

    Nashik News : वारी चुकायाची नाही! ‘सर्जा-भास्कर’ ओढणार संत निवृत्तीनाथांचा रथ, नाशिकमधील ‘या’ बैलजोडीला मिळाला मान; मालकाचे डोळे पाण्याने डबडबले

    Nashik Santh Nivruttinath Maharaj Chariot Sarja-Bhaskar : आषाढी एकादशीसाठी दरवर्षी पंढरपूरला भक्तांची वारी जाते. नाशिकमधल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ ओढण्याचा बहुमान ‘सर्जा-भास्कर’या बैलजोडीला मिळाला आहे.

    नाशिक इगतपुरी सर्जा भास्कर बैलजोडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, नाशिक : आषाढी एकादशीसाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडी सोहळ्यात श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ ओढण्याचा बहुमान इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील ‘सर्जा-भास्कर’या बैलजोडीला मिळाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुरंबी येथील वारकरी व शेतकरी गजीराम पुंजा यांच्यामते यांच्या या बैलजोडीला गेल्या पाच वर्षांत दुसऱ्यांदा रथ ओढण्याचा बहुमान मिळाला.

    बैलजोड्या आलटून-पालटून रथ ओढतात

    श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, रथ व नगारा गाडी ओढण्यासाठी सक्षम बैलजोडीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर तसेच पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असा ५० दिवसांचा पालखी सोहळा असतो. या बैलजोड्या आलटून-पालटून रथ ओढतात. दरम्यान, पावसाळ्यात दररोज १० ते १५ किमी प्रवास करावा लागत असल्याने सक्षम आणि प्रशिक्षित बैलजोडीची निवड केली जाते.
    Maharashtra TimesManoj Jarange Patil: मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेणार, पण कोर्टाच्या आदेशांचेही पालन करावे लागणार; जरांगेंच्या उपोषणावर बोलताना मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले?

    ‘चित्या’ आणि ‘धिंगाण्या’लाही मान

    संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ ओढण्याचा मान प्रथमच सिन्नर तालुक्याला मिळाला आहे. सुरेगाव येथील शेतकरी संपत भालेराव यांच्या ‘चित्या’ आणि ‘धिंगाण्या’ या बैलजोडीची निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे भालेराव कुटुंबाचा अनेक वर्षांचा प्रयत्न अखेर यशस्वी ठरला आहे. निवड झाल्यानंतर संपत भालेराव आणि त्यांचे बंधू राजाराम भालेराव यांनी पौष्टिक खुराक देत बैलांची विशेष काळजी घेतली जात आहे.

    माउलींच्या पालखीचे वेळापत्रक जाहीर

    आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी येत्या आठ जुलैला पंढरपूरला प्रस्थान ठेवणार असून, नऊ आणि दहा जुलैला पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतच कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुण्यातील मुक्कामाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आळंदी संस्थानने जाहीर केले असून, यंदा पालखीचे आठ जुलैला प्रस्थान आणि २४ जुलैला पालखी पंढरपूरला पोहचणार असल्याचे स्पष्ट केले. आळंदी ते पंढरपूर प्रवासात १७ मुक्काम, चार गोल रिंगण आणि तीन उभी रिंगणे होणार आहेत.
    Maharashtra Timesलोणावळ्यात 450 फूट खोल दरीत पडून नौदल कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; व्हिडिओ कॉलवर बोलणं महागात, काय घडलं?

    पालखीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

    ज्येष्ठ वद्य अष्टमी अर्थात आठ जुलै आळंदी येथून प्रस्थान, नऊ व १० जुलै पुण्यात मुक्काम, ११ व १२ जुलै सासवड मुक्कामी, १३ जुलै रोजी जेजुरी, १४ जुलै रोजी वाल्हे मुक्कामी राहणार आहे. १५ जुलै रोजी नीरा स्नान करून पालखी १६ जुलैला लोणंद येथे मुक्कामी असेल. लोणंद येथून पुढे दुपारी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी असणार आहे. १७ जुलैला फलटण, १८ जुलै रोजी बरड येथे पालखी मुक्कामी असेल.
    Maharashtra TimesPune Crime : संवेदना, सतर्कता अन् संताप; पुण्यातील प्रकरणाचे भयाण वास्तव, पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार असल्याचा आरोप
    नातेपुते येथे पालखी १९ जुलैला मुक्कामी राहणार आहे. २० जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल. २१ जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे पालखी मुक्कामी असेल. ठाकुरबुवा समाधीजवळ २२ जुलैला तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट होऊन पालखी भेंडीशेगावला मुक्कामी राहणार आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा