• Mon. Jun 15th, 2026

    राष्ट्रवादी सोडल्याने सुनेत्रा पवारांकडून दणका, फडणवीसांना पत्र? परांजपेंची प्रतिक्रिया

    राष्ट्रवादी सोडल्याने सुनेत्रा पवारांकडून दणका, फडणवीसांना पत्र? परांजपेंची प्रतिक्रिया


    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आनंद परांजपे यांची महामंडळावरील उपाध्यक्ष पदाची निवड रद्द करावी अशा संदर्भाचे पत्र दिले असल्याची चर्चा सध्या माध्यमांमधून जोर धरत आहे. या अनुषंगाने आनंद परांजपे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मला देखील ही माहिती माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या.मधूनच कळली असल्याचे सांगितले. नेमकं पत्र काय दिले आहे हे मला माहीत नाही पण मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आहे. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षातील नेत्यांसंदर्भात कसल्याही प्रकारची कटुता नाही, मी मूळचा शिवसैनिक आहे. शिवसेनेची स्थापना झाल्यापासूनच मी शिवसेनेमधूनच सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा मी शिवसेनेमध्ये आता सहभागी झालो आहे. त्यामुळे माझ्या मनामध्ये कसल्याही प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात कटुता नाही, असे आनंद परांजपे म्हणाले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed