• Sat. Jun 6th, 2026
    Crop Insurance: पावणेदोन लाख दावे नाकारले; ‘पीक विमा’ अमरावती जिल्ह्यातील बळीराजाच्या मुळावर

    Amaravati Farmer News: नव्या योजनेतील जाचक तांत्रिक निकषांमुळे नुकसान होऊनही हजारो शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे, तर कंपन्यांनी मात्र कोट्यवधींचा नफा कमावला आहे.

    पीक विमा योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, अमरावती: शासनाने एक रुपयात पीक विमा योजनेचा मोठा गाजावाजा केला असला, तरी प्रत्यक्षात ही योजना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांच्याच फायद्याची ठरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

    गतवर्षी लागू झालेल्या नव्या पीक विमा योजनेत पूर्वीचे महत्त्वाचे चार निकष हटवण्यात आले आहेत. आता केवळ पीक कापणी प्रयोग आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानावर आधारित ५० टक्के उत्पादकतेचा सरासरी निकष लावण्यात आला आहे. याच चुकीच्या निकषांमुळे प्रत्यक्ष शेतात पिकांचे अतोनात नुकसान होऊनही हजारो शेतकरी पीक विम्याचा दावा मिळवण्यास अपात्र ठरले आहेत.

    Maharashtra TimesVidhan Parishad : पार्थ पवार दिल्लीत तळ ठोकून, पुणे विधानपरिषदेची जागा NCP ला फिक्स? ‘तहा’त मोठं पद गमवावं लागण्याची चर्चा
    गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला; तर, ४२ मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. उत्पादनात प्रचंड घट होऊनही विमा कंपन्यांनी तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत तांत्रिक कारणांखाली या सर्व १० तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे दावे फेटाळून लावलयाचा आरोप होत आहे.

    योजनेवरील विश्वास उडाला !
    पीक विमा योजनेंतर्गत हक्काचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. ही योजना नेमकी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे की विमा कंपन्यांचे भले करण्यासाठी, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. या फसव्या कारभारामुळे आगामी हंगामात पीक विमा भरण्याकडे शेतकरी पाठ फिरवण्याची दाट शक्यता आहे.
    Maharashtra TimesTuljabhawani Temple Sanstha : तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत तब्बल 48 कोटी रोकड, गेल्यावर्षी 10 किलो सोनं दान; भाविकांच्या सोयीसाठी खर्च
    असे आहे आकड्यांचे गणित
    जिल्ह्यातील सहभागी शेतकरी : १ लाख ८५ हजार ५६०
    जमा झालेला एकूण प्रीमियम : ११.२४ कोटी रुपये
    (शेतकऱ्यांचे ८.९० कोटी आणि केंद्र व राज्य सरकारचे प्रत्येकी २.१२ कोटी)
    मंजूर झालेला क्लेम : २ कोटी ३० लाख रुपये
    लाभ मिळालेले शेतकरी : ९ हजार ३४२
    वंचित राहिलेले शेतकरी : १ लाख ७६ हजार २१८

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा