• Sat. Jun 6th, 2026
    Mount Everest Tragedy: शिखर तर गाठलं, पण परतीच्या वाटेवर अनर्थ; दोन भारतीय गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवर सोडला जीव

    Mount Everest Two Indian Climbers Death: जगातील सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’वर चढाई केल्यानंतर खाली उतरताना दुर्घटना घडली. दोन भारतीयांचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं?

    दोन भारतीय एव्हरेस्टवीरांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जगातील सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ वर यशस्वी केल्यानंतर खाली उतरत असताना चढाई दोन भारतीय गिर्यारोहकांचा गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती नेपाळच्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अरुण कुमार तिवारी आणि संदीप आरे अशी या गिर्यारोहकांची नावे आहेत.

    माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर यशस्वीपणे पोहोचल्यानंतर खाली उतरताना ही दुर्घटना घडली. आरे यांनी बुधवारी एव्हरेस्ट शिखर सर केले, तर तिवारी गुरुवारी संध्याकाळी ५ः३० च्या सुमारास आठ हजार ८४९ मीटर उंचीच्या शिखरावर पोहोचले होते. आरे हे कॅम्प दोनपर्यंत पोहोचले होते, तर तिवारी हे साऊथ समिटच्या जवळ होते. ‘एक्सपिडिशन ऑपरेटर असोसिएशन ऑफ नेपाळ’चे सरचिटणीस ऋषी भंडारी म्हणाले, ‘शिखरावरून खाली उतरत असताना हे दोघेही प्रचंड थकले होते. त्यांच्या शेर्पाने शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.’

    Maharashtra TimesAbhijeet Dipke : ‘आमचं नाही ऐकलं तर अमेरिकेतही संपवू!’ CJP अध्यक्ष अभिजित दीपकेंना आधी ऑफर दिली; नंतर उघड धमकी, काय घडलं?
    आठ हजार फुटांवरून त्यांचा मृतदेह खाली आणण्यासाठी सहा-सात शेर्पाची मदत घ्यावी लागणार असे सांगण्यात येत आहे. यासाठी एक लाख डॉलरचा खर्च येईल, अशी माहिती तिवारी यांचे बंधू दिनेश तिवारी यांनी दिली. तिवारी हे हैदराबादचे आहेत. तिवारी ५२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

    स्नो ब्लाइंडनेसचा त्रास

    एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी झालेले दुसरे गिर्यारोहक संदीप आरे यांनी एव्हरेस्ट गाठल्यानंतर त्यांना स्नो ब्लाइंडनेसचा त्रास होऊ लागला. या परिस्थितीत शेर्षांनी त्यांना कॅम्प दोनपर्यंत खाली आणले. परंतु कॅम्प दोन येथे त्यांचा मृत्यू झाला.

    Maharashtra TimesRitu Tawde: ही तर काँग्रेसची व्होटबँक; बोगस जन्मदाखल्यांबाबत महापौर रितू तावडे यांचा थेट आरोप
    ५०२ जणांना मिळाली होती परवानगी
    नेपाळ सरकारच्या पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२६च्या मोसमात एव्हरेस्ट चढण्यासाठी ५०२ गिर्यारोहकांना परवानगी देण्यात आली होती. अनेक गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर करण्याचे आपले स्वप्न साकार केले, मात्र, अरुण तिवारी अन् संदीप अरे यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर बेस कॅम्पवर या दोन्ही शूरवीरांसाठी श्रद्धांजली वाहिली जात आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा