महाराष्ट्र सोडून दुसरीकडे जावं, असा विचार आल्याचं अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आयोजित जलक्रांती परिषदेत नाना पाटेकरांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते मकरंद अनासपुरे आणि आमिर खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नानांनी आपलं मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र सोडण्याचा विचार मनात आलेला असं म्हटलं.