राज्यातील अनेक डोंगरदऱ्या, पाडे आणि दुर्गम भागांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळ मोठा फायदा होणार असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वाहतूक भत्ता जमा होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: डोंगरदऱ्या, पाडे आणि दुर्गम वस्त्यांमधून दररोज अनेक किलोमीटरची पायपीट करून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने राज्यभरातील सुमारे चार हजार वस्तीस्थाने घोषित करून, या भागांतील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा अथवा वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे राज्यातील २४ हजार ८२५ विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार असून, शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी जाहीर केला. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या परिसरात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक किलोमीटरच्या आत, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन किलोमीटरच्या आत शाळा असणे आवश्यक मानले जाते. मात्र, राज्यातील अनेक डोंगराळ, आदिवासी आणि विखुरलेल्या भागांमध्ये ही अट प्रत्यक्षात पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.
Water Shortage: यंदा मान्सूनमध्ये नागरिकांवर जलसंकट! राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ३३.१६ टक्क्यांवर; ‘एल निनो’मुळे चिंता
अनेक वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी ओढे, डोंगर आणि कच्चे रस्ते पार करावे लागतात. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती कमी होणे, शिक्षण अर्धवट सोडणे किंवा शाळाबाह्य होण्याचे प्रकार वाढत असल्याची नोंद शिक्षण विभागाकडे होती.
या निर्णयामुळे दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना शाळेत नियमितपणे पोहोचणे सोपे होणार आहे. काही भागांत वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहेे, तर काही ठिकाणी दिला जाणारा भत्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
‘समृद्धी’वरील पंपांवर कॅनच्या रांगा
जिल्हाभर इंधन टंचाई भासत असताना समृद्धी महामार्गावरील पेट्रोलपंपांवर मुबलक इंधनाची सुविधा आहे. हीच संधी साधून काही लोकांनी डिझेलविक्रीचा अवैध व्यवसाय सुरू केला आहे. या पंपांवर कॅनमध्ये डिझेल घ्यायचे आणि त्याची लगतच्या गावांमध्ये चढ्या भावाने विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू करण्यात येत आहे.
Mumbai News: मान्सूनसाठी ‘एमएमआरडीए’ सज्ज! मेट्रो मार्ग आणि रस्त्यांवर विविध पायाभूत सुविधा; कसा होणार फायदा?
डिझेल घेण्याकरिता पंपांवर चक्क कॅनचे नंबर लागलेले आढळून येत आहे. कॅनमध्ये अवैधरित्या डिझेल दिल्यानंतर तेच डिझेल काही दलालांमार्फत डोणगाव येथे विकले जाते. पेट्रोलपंपावरून ड्रम, कॅन किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये इंधन देण्यास मनाई असतानादेखील नियम धाब्यावर बसवले जात आहेत. वेळीच कारवाई न केल्यास समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. समृद्धी महामार्ग प्रशासन, महसूल विभाग आणि पोलिस विभागाने या डिझेलविक्रीवर कारवाईची मागणी होत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा