• Sun. Jun 7th, 2026
    उकाड्याने मुंबईकर कासावीस, कमाल तापमानाचा पारा 40 अंशांहून अधिक; मान्सूनचे आगमन कधी होणार?

    Weather Update: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा केली जात आहे. पुढील काही दिवस पारा चाळिशीवर राहण्याचा अंदाज आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ययेत्या आठवडाभरात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात आणि मुंबईत मान्सून कधी येणार, याकडे मुंबईकरांची नजर लागली आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्याचे प्रमाण मुंबईत वाढले आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणात सध्या कमाल तापमानाचा पारा नियंत्रणात आहे. मुंबईत सोमवारी कुलाबा येथील कमाल तापमान सांताक्रूझपेक्षा एका अंशाने अधिक होते. उर्वरित महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा ४० अंश किंवा त्याहून अधिक आहे.

    कसं आहे मुंबईतील तापमान?

    सांताक्रूझ येथे सोमवारी ३४.१ तर कुलाबा येथे ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाब्यापेक्षा सांताक्रूझ येथे वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने सांताक्रूझ येथे तापमान कुलाब्यापेक्षा कमी नोंदले गेले, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभाग अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. सर्वसाधारणपणे कुलाबा येथे सांताक्रूझ केंद्राच्या तुलनेत कमाल तापमान कमी असते. कुलाबा येथील सोमवारचे तापमान सरासरीहून १.१ अंशांनी अधिक होते. मुंबईत अजूनही मान्सूनपूर्व सरींनी उपस्थिती लावलेली नाही.Maharashtra TimesEl Nino: इतिहासातील सर्वात तीव्र ‘एल निनो’चा अंदाज; यंदा जूनमध्ये सक्रिय होणार, संपूर्ण मान्सून हंगामावर परिणाम

    शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये कोरड्या वातावरणाचा अंदाज आहे. तर २० ते २४ मे या कालावधीत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, अशीही शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथेही पारा चढा असून सरासरीपेक्षा २.५ अंशांहून अधिक कमाल तापमान नोंदवले गेले. महाबळेश्वर येथे ३२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबई आणि महाबळेश्वरच्या कमाल तापमानात सध्या दोन ते तीन अंशांचाच केवळ फरक आहे. कोल्हापूर आणि नाशिक येथे सध्या मुंबईहून अधिक कमाल तापमान असून कोल्हापूर येथे ३७.५ तर नाशिक येथे ३९.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.

    Maharashtra TimesWeather Update: उकाड्यापासून दिलासा मिळणार! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; कोकणात दोन दिवस पावसाचा अंदाज

    केरळमध्ये २६ मे रोजीमान्सूनचे आगमन शक्य

    ‘केरळमध्ये मान्सून यंदा २६ मेच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे,’ असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तवला. मान्सूनच्या आगमनाची ही तारीख चार दिवस मागे-पुढे होऊ शकते, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, दक्षिण किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागावर निर्माण झालेल्या चक्रीय चक्रवातामुळे पुढील पाच दिवसांत केरळ आणि माहेच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या हवामानप्रणालीमुळे केरळ, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा आणि दक्षिण लक्षद्वीपला लागून असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा