मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाच्या घोषणेमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागलंय. अशातच जरांगेंच्या विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यात सुरुवात केली आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांवर देखील गंभीर आरोप केले. मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर जरांगेंनी उपोषण सुरू केले असल्याचे देखील ते म्हणाले. यावरून आता मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी वाघमारेंना प्रत्युत्तर दिलंय.