• Mon. Jun 15th, 2026
    Nashik TCS News : मुक्काम कारागृहातच; धर्मांतर प्रकरणात AGMसह पाच जणांचे जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले, TCS प्रकरणात मोठी घडामोड

    Nashik TCS Case : ‘गुन्ह्यांचा तपास प्रगतिपथावर आहे. संशयितांबाबत सबळ पुरावे संकलित आहेत. आतापर्यंत झालेले युत्तिवाद, पीडितांचे जबाब या प्राथमिक व प्रमुख मुद्द्यावरुन संबंधित संशयितांचे जामीन न्यायालयाने नामंजूर केले आहेत’, असं विशेष सरकारी अजय मिसर यांनी म्हटलं आहे.

    टीसीएस धर्मांतर प्रकरण जामीन अर्ज फेटाळले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बहुराष्ट्रीय कंपनीतील महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात संशयितांनी जामिनासाठी केलेले अर्ज नाशिक न्यायालयाने फेटाळले आहेत. अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप, कट रचून केलेले गुन्हे, संकलित पुरावे आणि पीडितांचे जबाब यावरून न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामध्ये कंपनीची ‘एजीएम’ संशयित अश्विनी चैनानी हिच्यासह पाच संशयितांचा समावेश असून, त्यांचा मुक्काम आता नाशिकरोड कारागृहातच राहणार आहे.

    चार गुन्ह्यांतील जामीन अर्जांवर

    कंपनीतील विविध प्रकरणांबाबत दाखल नऊपैकी तीन गुन्ह्यांत संशयितांनी अद्याप जामिनासाठी धाव घेतलेली नाही. उर्वरित सहा गुन्ह्यांत संशयितांनी जामीन अर्ज सादर केले असून, त्यापैकी चार गुन्ह्यांतील जामीन अर्जांवर शुक्रवारी (दि. 15) अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये संशयित तौसिफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी, शफी शेख, कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी यांच्या जामीन अर्जांचा समावेश होता. दरम्यान, बलात्कारासह धर्मांतराच्या प्रयत्नात निदा खान हिच्या जामीन अर्जावर 25 मे, तर त्याच गुन्ह्यातील संशयित दानिश शेख व तौसिफ अत्तार यांच्या जामिनाबाबत 30 मे रोजी सुनावणी होणार आहे. यासह तरुणाच्या धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत गुन्ह्यात संशयित दानिश शेखच्या जामीन अर्जावर 6 जून रोजी सुनावणी होईल.
    Maharashtra TimesDhule Crime : बायकोसमोर अपमान केल्याचा राग, मुलाने जन्मदात्या आई-वडिलांचा जीव घेतला, लेकीच्या लग्नाचा आनंद विरला

    अटक होण्यापूर्वी कॉल

    दरम्यान, कंपनीची ‘एजीएम’ अश्विनी चैनानी हिला 10 एप्रिल रोजी पहिल्यांदा न्यायालयात हजर केले होते. चैनानी हिने संशयित दानिश शेख याला अटक होण्यापूर्वी कॉल केल्याचे एसआयटी तपासात स्पष्ट झाले होते. पहिला गुन्हा नोंद झाल्यानंतर चैनानीचे संशयितासोबत संभाषण झाल्यानंतर काही तासाच दानिशला पोलिसांनी अटक केली होती. पीडितेने विनयभंगाबाबत तक्रार केल्यानंतर तिने पीडितेला उद्देशून ‘तुमको क्या हायलाईट होना है?’ आणि आणि ‘जाने दो, छोड दो’ असे म्हंटले होते. यासह संशयितांसोबत तिचे कॉल्स, कंपनीतील विविध स्वरूपाचे संशयास्पद 78 ई-मेलबाबत पोलिसांनी पुरावे सादर केले आहेत. यासह उर्वरित संशयितांनी केलेले कृत्य अतिशय गंभीर स्वरूपाचे आणि जाणीवपूर्वक केल्याचे निरीक्षण यापूर्वीदेखील न्यायालयाने नोंदवले आहे. त्यांच्याविरुद्धचे पुरावे, पीडितांनी न्यायालयासमोर दिलेले जबाब आणि काही गुन्ह्यांबाबत सुरू असलेला सखोल तपास या मुद्द्यांवरून त्यांचे जामीन फेटाळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
    Maharashtra TimesMumbai News: मनोरी प्रकल्पामुळे मुंबईची तहान भागणार; समुद्रातून दोन बोगद्यांनी पाणी आणणार, पहिल्या टप्प्यात २० कोटी लीटर पाणी

    उच्च न्यायालयात अर्ज

    नाशिक न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे संबंधित संशयितांना आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. त्यासाठी संबंधितांनी अर्ज प्रक्रिया सुरू केल्याचे समजते. पुढील आठवड्यात काही जणांचे अर्ज मुंबई उच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर सुनावणी सुरू होईल. मात्र, पुढील काही दिवस संशयितांचा मुक्काम नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातच राहणार आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा