देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना आवाहन केलंय, ज्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे संताप व्यक्त केला. मोदी पंतप्रधान झाल्यापासून रूपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालं, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच तुमची मन की बात खूप झाली आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका, अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली होती. तर राज ठाकरेंच्या या पत्रावर आता मंत्री नितेश राणे चांगलेच संतापले आहेत.